Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण तिसरें
दोन नकार
संन्यासी नकार
हें सर्व ब्रह्म आहे. हा आत्मा ब्रह्म आहे. आणि तो चार अवस्थांत चार रूपें धारण करून आहे. संबंधातीत, लक्षणहीन, अचिंत्य असा चौथा, चौथ्या अवस्थेंतील, मूळ अवस्थेंतील आत्मा आहे, तेथें सर्व शांत शांत आहे.
माण्डूक्योपनिषद् श्लोक २ . ७
मागच्या प्रकरणांत आपण विश्वव्यापक जाणिवेपर्यंत आलों. पण विश्वव्यापक जाणीव कांहीं जाणिवेचीं शेवटली अवस्था नाहीं. तिच्या पलीकडेहि एक जाणीव आहे आणि तीहि आपण मिळवूं शकतों. वैयक्तिक जाणिवेहून विश्वव्यापक जाणीव जशीं फार श्रेष्ठ आहे, तशीच व्यक्ति आणि विश्व या दोघांच्याहि क्षेत्रांना सूक्ष्म अणुसमान लेखणारी विश्वातीत जाणीव, विश्वजाणिवेहून फार श्रेष्ठ आहे. अगदीं मोजतां येत नाहीं, मोजतां येणें अशक्य आहे एवढ्या अफाट पार्श्वभूमीवर अगदीं बारीकसें चित्र काढल्यास तें जसें त्या पार्श्वभूमीवर दिसेल तसें हें अफाट समजलें जाणारें आपलें विश्व त्या विश्वातीत जाणिवेच्या पार्श्वभूमीवर दिसतें. ती विश्वातीत जाणीव विश्वाच्या व्यवहाराला आधार देते, अथवा सहिष्णुतेनें तो चालूं देते, अशीहि वस्तुस्थिति असते. ती विश्वातीत जाणीव अफाट विश्वजीवन व्यापून टाकते, त्याला जवळ घेऊन पोटाशीं धरते, अथवा आपल्या अनंत क्षेत्रांतून त्याचीं हकालपट्टीहि करतें.
जडद्रव्य हेंच सत्य आहे असें जडवादी आपल्या दृष्टीनें म्हणतो, हें
पान क्र. ३२
संबंध-सापेक्ष जग ही एकच वस्तु, जिचें थोडेंबहुत निश्चित निःसंदेह ज्ञान होते अशीं सत्य वस्तु आहे, असें प्रतिपादितो. या जगाच्या पलीकडे खरोखरी कांहीं नाहींच, पण कांहीं आहे असें मानलें तरी तें सर्वथा अज्ञेय आहे, तें मनाचें एक स्वप्न आहे, विचारप्रिय बुद्धीचीं, सत्याला सोडचिठ्ठी दिलेली ती एक अवास्तव कल्पना आहे, असा युक्तिवाद करतो. हें जडवाद्याचें करणें जर न्यायसंगत असेल तर उलटपक्षीं संन्यासी जो पक्ष मांडतो तोहि न्यायसंगत मानला पाहिजे. संन्यासी हा विश्वातीत जाणिवेनें भारलेला, तिच्या मोहांत सांपडलेला असतो. तो आपल्या दृष्टीनें असें आग्रहानें प्रतिपादतो कीं, शुद्ध आत्मा हीच एक सत्य वस्तु आहे. कारण हीच एक अशीं वस्तु आहे कीं, जिच्यांत कमीअधिक होत नाहीं, जिला जन्म नाहीं, मरण नाहीं; त्याच्या दृष्टीनें संबंधसापेक्ष जग हें मनानें व इंद्रियांनीं निर्मिलेलें एक स्वप्न आहे. शुद्ध शाश्वत जाणीवरूप सत्यवस्तूपासून माघार घेऊन असत्यांत वावरणाऱ्या बुद्धीचीं ती एक अवास्तव कल्पना आहे.
जडवाद्याचें प्रतिपादन एका टोंकाला व संन्यासी प्रतिपादन दुसऱ्या टोंकाला, असें असतां एका प्रतिपादनाच्या बाजूनें जो अनुभवाचा पुरावा व युक्तिवाद दिला जातो त्याच्या इतकाच जोरदार व निर्दोष भासणारा अनुभवाचा पुरावा व युक्तिवाद दुसऱ्या प्रतिपादनाच्या बाजूनेंहि देतां येतो ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे. आतां, जडद्रव्याचें जग हेंच फक्त सत्य आहे असें स्थूल भौतिक इंद्रियांचा अनुभव सांगतो; पण या इंद्रियांना अशीं शक्तीच नाहीं कीं, जिच्या उपयोगानें, त्यांना अभौतिकाचा, स्थूल जडद्रव्याचें रूप नसलेल्या कोणत्याहि वस्तूचा अनुभव घेतां येईल. असें असल्यानें या स्थूल इंद्रियांचा अनुभव विश्वसनीय मानल्यास, इंद्रियातीत तें तें सर्व असत्य असें आपणांस मानलें पाहिजे; पण असें आपण मानू शकत नाहीं. जें इंद्रियातीत तें असत्य, असें भासविणारीं आपलीं स्थूल शरीराचीं इंद्रियें अगदींच प्राकृत, निर्बुद्ध अडाणीपणाचीं चूक करतात; या चुकीला तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांतील युक्तिवादाच्या मांडणीचें रूप दिल्यानें, त्या चुकींतील दोष कमी होत नाहीं. स्थूल इंद्रियांचा दावा निराधार आहे हें उघड आहे. जडाच्या जगांत देखील अशा पुष्कळ गोष्टी आहेत कीं, ज्यांचें ज्ञान स्थूल इंद्रियांना होणें अशक्य असतें. स्थूल इंद्रियांना ज्ञात होणारी वस्तु तेवढी सत्यवस्तु असें इंद्रियें मानतात. इंद्रियांच्या दृष्टीनें या दोन वस्तूंचें नित्य साहचर्य दिसत असलें तरी तो भास
पान क्र. ३३
आहे, भ्रम आहे आणि 'इंद्रियातीत असें कांहीं नाहीं, इंद्रियातीताचा अनुभव हा निश्चितपणें भ्रमरूप आहे, भासरूप आहे' हें जडवाद्यांचें विधान या भ्रमावर आधारलेलें आहे. याप्रमाणें जडवादी जीं गोष्ट सत्य म्हणून सिद्ध करूं इच्छितात ती गोष्ट, (इंद्रिय प्रत्यक्षच केवळ सत्य ही गोष्ट) त्यांनीं प्रथमपासून गृहीत धरलेली आहे, आणि म्हणून त्यांच्या युक्तिवादांत चक्रापत्तीचा दोष आहे. असा युक्तिवाद निःपक्षपाती तर्कापुढें टिकूं शकत नाहीं.
आपल्या स्थूल इंद्रियांना ज्ञात होऊं शकत नाहींत अशा सत्य भौतिक वस्तु आहेत, इतकेंच नव्हे तर पुरावा व अनुभव यांनीं सत्यत्व परीक्षावयांचें तर आम्हाला स्थूल भौतिकातीत इंद्रियें सुद्धां आहेत. (या इंद्रियांना सूक्ष्म इंद्रियें म्हणतात. हीं इंद्रियें सूक्ष्म देहांत असतात, त्यांच्या साधनानें सूक्ष्म दर्शन घडते, सूक्ष्म अनुभव येतो, त्यांच्या दृष्टीला सूक्ष्म दृष्टि म्हणतात.) स्थूल शारीर इंद्रियांच्या सहाय्यावांचून जड जगाच्या सत्य वस्तूंचें ज्ञान या इंद्रियांना होऊं शकतें इतकेंच नव्हे, तर इतर दुसऱ्या अतिभौतिक जगांतील सत्य वस्तूशींहि हीं इंद्रियें आमचा संबंध आणतात. अर्थात् ज्या स्थूल जडद्रव्याचें साहित्य घेऊन आपला सूर्य आणि आपलीं पृथ्वी बनविलेली दिसतात, त्या द्रव्याहून कोणत्यातरी वेगळ्या द्रव्यावर अवलंबून असलेल्या अनुभवांची व जाणिवेची व्यवस्थित रचना अधिभौतिक जगांत आहे. आमचीं सूक्ष्म इंद्रियें त्या जगांतील सत्य वस्तूंशीं आमचा संबंध आणतात.
मनुष्य विचार करूं लागला तेव्हांपासून सतत हे अतिभौतिक विषयक व सूक्ष्मेंद्रियविषयक सत्य, त्याच्या अनुभवास आलेलें आहे व त्याच्या विश्वासाचा विषय झालेलें आहे; आणि आतां, जेव्हां भौतिक जगाचीं रहस्यें समजून घेण्याकडे सारें लक्ष देण्याचीं गरज राहिलेली नाहीं, तेव्हां या सत्याला नव्या शास्त्रीय संशोधन पद्धती पाठिंबा देऊं लागल्या आहेत. मनोमार्गीय विचार-वाहन आणि तत्सम घटना यांचें संशोधन होऊन त्यांची सत्यता संशोधकांना पटली आहे. भौतिक विश्वाप्रमाणें अतिभौतिक विश्व व सूक्ष्म इंद्रियें असल्याचा हा अगदीं सर्वांत उघड प्रत्यक्ष पुरावा आहे. अशा तऱ्हेचा पुरावा सारखा वाढत आहे. या पुराव्यानें अतिभौतिक विश्वाच्या व सूक्ष्म इंद्रियांच्या सत्यतेबद्दल बहुतेकांचीं खात्री लवकरच पटेल. अर्थात् कांहीं लोक या पुराव्याला दाद देणार नाहींत. ज्यांचीं मनें प्रतापी जडवादाच्या भूतकालीन विजयांनीं भरलेलीं व भारलेलीं आणि त्या विजयाच्या स्तुतीच्या कवचांत अडकून पडलेलीं आहेत,
पान क्र. ३४
आतां हें मात्र खरें आहे कीं, पद्धतशीर संशोधनानें अतिभौतिक सत्याचें जें ओझरतें दर्शन घडवलेलें आहे तें थोडेबहुत अपूर्ण व सदोष असल्यानें त्या सत्याचें सत्यत्व तितकें जोरदारपणें प्रतिपादतां येत नाहीं, आलेलें नाहीं. याचें कारण हें कीं, संशोधनाच्या चालू पद्धतींत अद्यापि बराच भोंगळपणा व सदोषता आहे. ज्या सूक्ष्म इद्रियांचा या नव्या युगांत पुन्हां शोध लागला आहे त्यांनीं कमीत कमी इतकें तरी दाखवून दिलें आहे कीं, स्थूल इंद्रियांना ज्या भौतिक घटना दिसत नाहींत, त्या भौतिक घटना सूक्ष्म इंद्रियांना निःसंशयपणें दिसतात. असें जर आहे तर जाणिवेच्या भौतिक रचनेच्या, म्हणजे आमच्या शारीर स्थूल इंद्रियांच्या क्षेत्रांत ज्या घटना येत नाहींत त्या अतिभौतिक घटना आम्हाला दिसतात असें त्यांनीं म्हटलें असतां, खोटे साक्षीदार म्हणून त्यांना तिरस्कारानें अविश्वासार्ह ठरविणें न्यायसंगत नाहीं हें उघड आहे. ही गोष्ट मान्य आहे कीं, स्थूल इंद्रियांचा किंवा कोणाचाहि कोणताहि पुरावा बुद्धीच्या नेतृत्वाखालीं जमवावा लागतो, बुद्धीनें तपासावा लागतो, बुद्धीनें त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागते; त्याचा अर्थ लावतांना व संबंध ठरवतांना योग्य अशी पद्धति वापरून योग्य काळजी घ्यावी लागते, आणि नंतर या पुराव्यावरून त्या स्थूल इंद्रियांचे वा इतर कोणाचें कार्यक्षेत्र, कार्याचे नियम आणि प्रक्रिया निश्चित कराव्या लागतात. सूक्ष्म इंद्रियांच्या बाबतींतहि हें सर्व असेच तपशीलवार केलें जावें या गोष्टीला आमचीं पूर्ण मान्यता आहे. पण आमचें म्हणणें एवढेंच आहे कीं, स्थूल भौतिक द्रव्याच्या बनविलेल्या साधनांपेक्षां अधिक सूक्ष्म साधनांनीं दिसणारीं अधिक सूक्ष्म द्रव्याचे पदार्थ असलेलीं, सूक्ष्म अनुभवांचीं विस्तृत क्षेत्रें, या स्थूल भौतिक विश्वाबरोबर ब्रह्मांडांत आहेत आणि त्यांचीं सत्यता या
पान क्र. ३५
पण सर्व जगें, सर्व विश्वें हीं केवळ आम्हांला अनुभव मिळवून देणारीं मर्यादाबद्ध क्षेत्रें आहेत, आणि इंद्रियें हीं केवळ अनुभव घेण्याचीं सोईचीं साधनें आहेत. सर्वांच्या मुळाशीं जीं महान् वस्तु आहे ती म्हणजे आम्हांमधील जाणीव, अनुभव घेणारी जाणीव होय. ही जाणीव सर्वसाक्षी द्रष्टा आहे. या द्रष्ट्यासाठीं विश्व हें अनुभवाचें क्षेत्र व इंद्रियें हीं अनुभवाचीं साधनें आहेत. सर्व विश्वें आणि त्यांतील सर्व वस्तु आपण सत्य आहोंत किंवा कसे, याचा निर्णय करुन घेण्यासाठीं आम्हांमधील सर्वमूळ, सर्वाधार, सर्वसाक्षी दृष्ट्याकडे अंतिम अर्ज घेऊन येतात. विश्व एक आहे कीं अनेक विश्वें आहेत, भौतिक विश्व आहे कीं नाहीं, अतिभौतिक विश्व आहे कीं नाहीं, हें सर्व, या द्रष्ट्याचा अनुभव काय असेल त्यावरून ठरतें. आमच्यांतील या द्रष्ट्याच्या अनुभवाखेरीज दुसरा कोणताहि अस्तित्व-निर्णायक पुरावा, आम्हाला उपलब्ध नाहीं. असा युक्तिवाद करतात कीं, 'मानवाचीं प्राकृतिक रचना आणि त्याची त्याच्या भोंवतालच्या जगाकडे पाहण्याचीं दृष्टि, ही विशिष्ट प्रकारची असल्यानें, जगाचें व त्याचें वरील प्रकारचें विशिष्ट नातें उत्पन्न झालें आहे, असें नसून खरी वस्तुस्थिति अशीं आहे कीं, दृश्य अस्तित्वाचा हा स्वभावच आहे. अनुभव घेणारी जाणीव आणि क्रियाशील वस्तु किंवा अनुभवविषय, हे दोन घटक मिळूनच सर्व दृश्य अस्तित्व बनतें. वस्तुगत क्रिया ही द्रष्ट्याशिवाय घडूंच शकत नाहीं. कारण वस्तुरूप वस्तुमय विश्व हें द्रष्ट्या जाणिवेच्यासाठीं व जाणिवेच्या पोटीं असते, स्वतंत्र असूं शकत नाहीं, त्याला स्वतंत्र खरें अस्तित्व नाहीं.' या युक्तिवादाच्या उलट असाहि युक्तिवाद करतात कीं, 'भौतिक विश्व स्वयंभू आहे, शाश्वत आहे; प्राण आणि मन यांचा उदय होण्यापूर्वींपासून तें आहे; या दोघांचा
पान क्र. ३६
यांपैकी जडवादी युक्तिवाद प्रथम घेऊं व त्याचा व्यावहारिक अर्थ पाहूं. या युक्तिवादाचीं कसून तपासणी केलीं तर अशा निर्णयाला आपण येतो कीं, मानवी व्यक्तीचें जीवन काय किंवा मानवी जातीचें जीवन काय, अर्थशून्य आहे, मिथ्या आहे; आणि या निर्णयांतून न्यायतः जीवनाचे दोन पर्याय आमच्यापुढें उभे राहतात. माणूस आज आहे उद्यां नाहीं, तेव्हां त्यानें ''जीवन जगून घ्यावे.'' अर्थात् जो काय भोग जीवनांत येनकेन प्रकारेण त्याला मिळण्यासारखा असेल त्यासाठीं त्यानें उसंत न घेतां धडपड तडफड करीत रहावे, हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय असा कीं, त्यानें मानव जातीची किंवा मानवी व्यक्तीची विरक्तपणें निष्काम सेवा करावी. ही धडपड किंवा सेवा करतांना त्यानें ही जाणीव ठेवावी कीं, मानवी व्यक्ति ही सत्य नसून तो एक त्याच्या मज्जातंतूमय मनानें अर्थात् जड मज्जातंतूंच्या तालबद्ध गतीनें निर्माण केलेला अल्पकाळ टिकणारा भ्रम आहे आणि मानवजात वरील भ्रमाचे जरा अधिक काळ टिकणारें सामुदायिक रूप आहे. आम्ही काम करतो किंवा करमणूक करतो ती जड शक्तीच्या प्रेरणेनें करतो. ''शक्य तेवढी करमणूक करून जीवन जगून घ्यावें, आहे चार दिवस तोंवर'' ही प्रेरणा तिची; ''नैतिक ध्येय समोर ठेवून, बौद्धिक पूर्णतेचें ध्येय पुढें ठेवून माणसानें काम करीत रहावें'' ही प्रेरणाहि तिचीच, असें जडवाद सांगतो. अर्थात् दोन्ही प्रेरणा आमचीं फसवणूक करीत असतात. भ्रमांच्या भोंवतीं आम्हाला भिरभिरावयास
पान क्र. ३७
वा नसो आमच्याकडून, आपल्या प्रभावानें करमणूक किंवा काम करवून घेते म्हणून, भोगी जीवनाची किंवा नैतिक, बौद्धिक जीवनाची ओढ, ही माया आहे असें म्हणावयाचे; या मायेचें कार्य वरवर दिसण्यापुरतें होणारे आणि अल्पकाळ टिकणारें असलें तरी ही माया नाहीं असें म्हणावयाचें. जीवन म्हणजे काय तर, प्राण आणि मन याचा व्यवहार. पण प्राण आणि मन, हीच मुळीं जडवादांत मायेच्या सदरात येतात. एक जड द्रव्य, जडशक्ति काय तें शाश्वत सत्य, आणि प्राण आणि मन ही त्यांतून उदय पावून कांहीं काळानें विलयास जाणारी माया आहे असें जडवादाचें ठाम मत आहे. आतां, जडवादाच्या उलट दुसऱ्या टोंकाला जो चैतन्यवाद (आत्मवाद-जाणीववाद) आहे त्यांत स्वतंत्र वस्तुरूप जगाची, अर्थात् जड विश्वाची मायारूपता किंवा असत्यता प्रतिपादिली आहे. या असत्यतेवर जर आपण भलताच जोर दिला तर दुसऱ्या मार्गानें वरच्याच प्रकारचें पण जास्ती कठोर सिद्धांत आपल्याला मानावे लागतात. व्यक्तीचा मी हा सर्वथैव भ्रमरूप आहे, मानवी जीवन निरर्थक आहे आणि मिथ्या आहे, सर्व अस्तित्वाच्या पलीकडे जें ''असत्'' किंवा संबंधनिरपेक्ष केवल चैतन्य आहे, जें आपलें मूलस्थान आहे, तेथें परत जाणें, त्यांत विलीन होणें हाच एक बुद्धीला पटण्यासारखा मार्ग आहे, भौतिक जीवन हा एक अर्थशून्य गोंधळ असून त्यांतून सुटण्याचा दुसरा मार्ग नाहीं हे सिद्धांत आपल्याला त्यामुळें मानावे लागतात.
पण तर्कशास्त्र ज्या आधारावर हें सिद्धांत बसवितें तो आधार कच्चा आहे. सामान्य भौतिक जीवन पाहून तर्कशास्त्र युक्तिवाद करतें, पण या भौतिक जीवनांत जडवादाला काय किंवा चैतन्यवादाला काय, आपलें सिद्धांत पक्केपणीं रचावयाला अनुभवाचा पुरता भरीव पाया मिळत नाहीं. त्यांत जागजागीं खड्डे किंवा अपुरे अनुभव असतात; आणि म्हणून दोन्हीहि युक्तिवाद निर्णायक होऊं शकत नाहींत. सामान्यतः पहातां, व्यक्तीच्या देहाशीं, व्यक्तीच्या शारीरिक जीवनाशीं निगडित नसलेला विश्वमानसाचा किंवा अतिमानसाचा अनुभव, निश्चित, नि:संदेह अनुभव, आमच्या अनुभव-भांडारांत नाहीं; उलटपक्षीं, आमच्या देहांत असणारा आत्मा, देहावर सर्वथा अवलंबून आहे, देहाच्या मरणानंतर तो जगणार नाहीं,
पान क्र. ३८
आमच्या जाणिवेचें क्षेत्र समाधानकारकपणें वाढावयाचें तर तें अनिवार्यपणें देहाच्या आंत, प्राणाच्या आंत, मनाच्या आंत वाढणार आणि वाढत वाढत वैयक्तिक देहासुद्धां, प्राणासुद्धां, मनासुद्धां सर्व विश्व आपल्या पोटांत येणार; अर्थात् आमची जाणीव आज व्यक्ति-जीवन जगत आहे, व्यक्तीचें अस्तित्व व्यापून आहे. ती पूर्ण वाढीअंतीं विश्वजीवन जगूं लागणार, विश्वाचें अस्तित्व व्यापून रहाणार. विश्वाचें अस्तित्व द्रष्ट्या जाणिवेच्यासाठीं, त्या द्रष्ट्या जाणिवेच्या पोटीं असतें, स्वतंत्र असूं शकत नाहीं, असें पूर्वीं म्हटलें आहे -- हा द्रष्टा म्हणजे विश्वाच्या पोटीं जन्म घेणारें देहधारी वैयक्तिक मन असूं शकत नाहीं, तर विश्वव्यापी जाणीवच द्रष्टा असूं शकतें. ही जाणीव तिनें निर्माण केलेल्या सर्व वस्तूंच्या व घटनांच्या पोटीं, अन्तर्यामीं प्रज्ञा म्हणून असते. विश्वाचा आणि या विश्व-चैतन्याचा संबंध दोन प्रकारचा असूं शकतो. विश्व हें, या चैतन्याचा नित्य आणि सत्य असा क्रियात्मक आविष्कार असूं शकतें किंवा तें या चैतन्यांत त्याच्या ज्ञानक्रियेनें किंवा ज्ञानयुक्त शक्तीनें उदय पावतें व विलीन होतें, असाहि दोघांचा संबंध असूं शकतों. तेव्हां विश्वाचें द्रष्टेपण विश्वाच्या पोटीं असलेल्या मनाकडे येऊं शकत नाहीं, तर जें चैतन्य नित्य आहे, शांत शांत आहे, जीवमान पृथ्वी आणि जीवमान मानवी शरीर या दोन्हीं ठिकाणीं दोहोंच्याहि अंतर्यामीं सारखेंच चिंतन करीत, चिंता करीत जें बसलें आहे, मन आणि इंद्रियें हीं ज्याचीं अवश्य नसणारीं अशीं साधनें आहेत -- तें चैतन्यच विश्वाचा द्रष्टा, धनी व स्वामी आहे, होऊं शकतें.
मानवांत विश्वव्यापी जाणीव उदय पावूं शकतें ही गोष्ट आधुनिक मानसशास्त्र हळू हळू मान्य करूं लागलें आहे; एकापेक्षां एक सोईचीं, कमी अधिक कामाचा बोजा व धक्का सहन करून सारखीच कार्यक्षम राहणारीं, ज्ञानप्राप्तीचीं साधनें जशीं निघूं शकतात, त्याप्रमाणें मानवाला विश्व-
पान क्र. ३९
या विश्वचैतन्यांत आपण प्रवेश केला व त्याच्याशीं एकरूप झालों म्हणजे विश्वाचें अस्तित्व मूलत: एकवस्तुरूप आहे, विश्व मूलत: एकच जाणीवपूर्ण वस्तु आहे या सत्याचें स्वरूप, आपली इच्छा असल्यास, आपण कांहीं काळ पारखीत बसूं शकतो; असें केल्यास आपणांस कळूं लागतें कीं, विश्वाच्या एकतेचा अनुभव आल्यानें आपल्या जाणिवेच्या धारणा, इंद्रियांच्या संवेदना या सर्वांत बदल होऊं लागतो. आपल्याला असें स्पष्ट दिसतें कीं, एकचएक मूळ वस्तु, जड तत्त्व (अन्नतत्त्व), प्राणतत्त्व, मानसतत्त्व वगैरे प्रकारांनीं व्यक्त झाली आहे. जडतत्त्व होऊन त्या अद्वितीय वस्तूनें आपल्या एका जडरूपाचीं अनेक रूपें (शरीरें) करून तीं एकमेकांपासून भौतिक दृष्ट्या विभक्त केलीं आहेत आणि या विभक्त शरीरांना अर्थात् अंतरीं स्वत:ला धारण करणाऱ्या या अगण्य, अलग अलग, आकारांना परस्पर संबंध ठेवतां यावा म्हणून भौतिक साधनेंहि निर्माण केलीं आहेत. प्राणतत्त्वाची आणि मानसतत्त्वाची व्यवस्था याच प्रकारचीं दिसते. अनेक प्राणमय रूपांत प्राणतत्त्व विभागलें गेलें आहे; आणि अनेक मानसरूपांत मानसतत्त्व विभागलें गेलें आहे. सर्वत्र अंतर्यामांत चैतन्यवस्तूचें ठाण आहे आणि प्राणाच्या क्षेत्रांत प्राणमय व मानसक्षेत्रांत मनोमय साधनांनीं विभक्त प्राणरूपें व मनोरूपें एकमेकांशीं संबंध ठेवूं शकतील अशी व्यवस्था आहे. मानसतत्त्वाच्या वरतीं कांहीं पायऱ्यानंतर अतिमानसतत्त्व-विज्ञानतत्त्व आपल्या नजरेस येतें. या तत्त्वाचा संचार, व्यवहार, सर्व विश्वांत आहे आणि त्याच्याहून खालच्या पायरीवरील मन प्राण आदि तत्त्वांची हालचाल या तत्त्वाच्या इच्छेनुसार चाललेली आहे हें
पान क्र. ४०
तेव्हां, विश्वचैतन्याशीं, विश्वात्म्याशीं ज्या कोणाचा थोडा बहुत संबंध आला असेल किंवा जो कोणी या विश्वात्म्यांत प्रतिष्ठित होऊन जीवन जगत असेल, त्याला भौतिक वस्तु जितकी खरी वाटते त्यापेक्षां हा विश्वात्मा, विश्व चैतन्य अधिक खरें वाटतें; तें स्वत: व त्याचे परिणाम, त्याचीं कार्यें या गोष्टी अनुभवी माणसाला भौतिक वस्तूइतक्या, नव्हे, अधिक खऱ्या वाटतात, असतात. भौतिक जगाच्या दृष्टीनें विश्वचैतन्य हें जसें भौतिक जगापेक्षां अधिक सत्य आहे; तसें विश्वचैतन्याच्या दृष्टीनें भौतिक जग सत्य आहे कीं नाहीं? या प्रश्नाचें उत्तर - 'भौतिक जग सत्य आहे,' - असें आहे. चैतन्याचा पूर्ण आविष्कार या रूपानें तें विश्व, अस्तित्वांत आहे; मात्र त्याचें अस्तित्व विश्वचैतन्याच्या अस्तित्वासारखें स्वतंत्र नसून विश्वचैतन्याच्या अस्तित्वावर व आविष्कृत होण्याच्या संकल्पावर अवलंबून आहे. विश्वचैतन्याशीं तादात्म्य पावल्यानें किंवा त्याच्याशीं घनिष्ठ संबंध आल्यानें आपल्याला जो अनुभव
पान क्र. ४१
वर जें पुरुषोत्तमनामक स्वयंभू जाणीवपूर्ण अस्तित्व जगाचें मूळ म्हणून सांगितलें, तें मनाच्या पलीकडे, पुष्कळ पलीकडे असलेल्या आपल्या अतिमानस तत्त्वाचें, अनंत असीम विज्ञानतत्त्वाचें, साह्य घेऊन जग आकारास आणतें. तें जगाच्या तालबद्ध घटनांत सर्वत्र आहे. तथापि तें जगाहून फार मोठें आहे, स्वतंत्र आहे. त्याची अनंतता शब्दशक्तीच्या पलीकडे आहे. जग त्याच्या आधारानें असतें, जगाचा आधार त्याला लागत नाहीं, जगावांचून तें असूं शकतें. ज्याप्रमाणें आम्हाला विश्वचैतन्यांत प्रवेश करून सर्व विश्वाच्या अस्तित्वाशीं एकरूप होतां येतें, त्याप्रमाणें विश्वातीत चैतन्यांत आम्हाला प्रवेश करतां येतो आणि असा प्रवेश करून विश्वाच्या अस्तित्वावांचून आम्हाला राहतां येतें. याप्रमाणें विश्वातीत विश्वनिरपेक्ष अस्तित्व, जीवन आम्हाला लाभलें म्हणजे आम्हीं विश्वाला, विश्वांतील अस्तित्वाला, जीवनाला रजा द्यावी काय - दिलीच पाहिजे काय? विश्व व विश्वांतील जीवन खोटें असें मानावें काय, मानलेंच पाहिजे काय ? या विश्वाचा आणि विश्वातीताचा संबंध कसा आहे ? हे प्रश्न उभे राहतात.
पान क्र. ४२
दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हां जुन्या आर्य जगांतील समतोलपणा बुद्धमतानें बिघडविला तेव्हांपासून जडाविरुद्ध आत्म्याचें हें बंड भारतीय मनावर अधिकाधिक प्रभाव गाजवीत आलें आहे. भारतीय विचारांत विश्वाच्या असत्यतेची, भ्रमरूपत्वाची भावना सर्वत्र भरलेली आहे असें नाहीं; जगन्मिथ्यावादाप्रमाणें दुसरेहि वाद भारतीय तत्त्वज्ञानांत आहेत; भारतीय धार्मिक ध्येयांत संन्यासी ध्येयापेक्षां वेगळीं ध्येयेंहि आहेत. अगदीं अतिवादी तत्त्वज्ञानांच्या वादांतहि जडतत्त्व आणि आत्मतत्त्व यांचा विरोध कमी
पान क्र. ४३
करून, दोहोंत समन्वय साधण्याचा प्रयत्नहि थोडाबहुत केलेला आढळतो, तथापि वरील महान् नकाराचीं छाया सर्वांच्या जीवनावर पडलेली आहे, सर्वांचें जीवनाचें अंतिम ध्येय संन्याशाची कफनी, हें आहे असें दिसेल. जीवनाचीं जीं सर्वसाधारण कल्पना आहे तींत कर्माच्या शृंखलेसंबंधाची बौद्ध उपपत्ति भरलेली असल्यामुळें बंध आणि मोक्ष - जन्मानें बंध आणि जन्म येण्याचें संपण्यानें मोक्ष - ही अन्योन्य विरोधी जोडी त्या कल्पनेंत आहे. या कारणानें या सर्व आवाजांतून असा एकच महान् सूर निघतो कीं, आम्हाला हवें असलेलें स्वर्गीय राज्य या द्वंद्वांच्या जगांत असूं शकणार नाहीं, तें या जगाच्या पलीकडे कोठेंतरी आहे; शाश्वत १वृंदावनांतील आनंद-भोग, २ब्रह्मलोकांतील श्रेष्ठ सुख, सर्व व्यक्ताच्या पलीकडे असलेलें अवर्णनीय निर्वाण,३ जेथें भेदाचा अनुभव समूळ संपतो असें निर्गुण अनिर्वाच्य एकरस शांत अद्वैत - या अवस्थांत कोठेंतरी स्वर्गीय राज्य आहे, या जगांत तें नाहीं व असूं शकणार नाहीं.
या स्वर्गांपैकीं कोठल्यातरी स्वर्गाकडे साधकांचें लक्ष लागलेलें आढळतें. या प्रवृत्तीनुसार शतकानुशतकें भारतांत शेंकडों महापुरुष हाच एक कळकळीचा, उच्च आणि दूरगामी संदेश देत आले आहेत कीं, ''भौतिक जीवनाचा संन्यास हा एकच ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे; भौतिक जीवनाचा अंगीकार ही अज्ञानाची प्रवृत्ति आहे, मानवाच्या जन्माचा खरा उपयोग जन्मापासून सुटका करून घेणें हा आहे. आत्म्याची हांक ऐका, जडापासून निवृत्त व्हा, जडाचा संबंध तोडून टाका.'' हा संदेश देणारे महापुरुष, संत आणि सद्गुरु यांची जणुं एक मोठी मालिकाच गेलीं कित्येक शतकें वरील संदेशांतील उपदेश स्वत: आचरून व त्याच्या
-------------------------
१ शाश्वत वृंदावन म्हणजे गोलोक. हा वैष्णवांचा स्वर्ग, येथें शाश्वत सौंदर्य व शाश्वत सुख आहे.
२ ब्रह्मलोक म्हणजे शुद्ध अस्तित्व, जाणीव आणि सुख असलेली परमोच्च स्थिति. अनिर्वाच्य अद्वैतात पूर्णपणें विलीन न होतां, लाभूं शकणारी ही स्थिति आहे.
३ निर्वाण म्हणजे लय, विलय : सर्वच अस्तित्वाचा विलय असा याचा अर्थ घेतला पाहिजे असें नाहीं. आपल्याला ज्याचा अनुभव येतो त्या अस्तित्वाचा लय - अहम्, वासना, अहंमूलक वृत्ति व कृति यांचा नाश, यांचा लय - एवढाच निर्वाण याचा अर्थ होतो.
पान क्र. ४४
सत्यतेचा स्वत: अनुभव घेऊन मग लोकांना तो कळकळीनें देत आलेली आहे; या थोर अनुभवी तेजस्वी संतांना आणि सद्गुरुंना भारत थोर मान देत आला आहे, त्यांची स्मृति तो पवित्र मानीत आला आहे. भारतीयांच्या कल्पनेमध्यें त्यांना फार प्रभावी स्थान आहे.
संन्यासी मनोवृत्तीशीं सहानुभूति बाळगणारें हें युग नाहीं. भारत सोडून सर्व जगांत, संसार सोडणाऱ्या विरक्तांना मान देण्याचा काळ संपला आहे किंवा संपत आला आहे. अशा काळी, अशा युगांत संन्यासाच्या थोर प्रवृत्तीचें कारण, भारतांतील प्राचीन आर्यजातीची जीवनशक्तीच कमी झाली होती हें आहे, असें प्रतिपादन करणें सोपें आहे. 'प्राचीन भारतीयांनीं मानवजातीच्या सर्वसामान्य प्रगतीच्या कार्यांत फार मोठा भाग घेतला, मानवी ज्ञानसंवर्धनांत आणि मानवी कर्तबगारींत त्यांनीं अनेक दिशांनीं भरपूर कार्य करून भर घातली आणि हें जें ओझें पुष्कळ काळ त्यांनीं शिरावर वागविलें त्यामुळें ते थकून गेले, त्यांची जीवनशक्ति आटून गेली आणि या कारणानें त्यांच्यामध्यें संन्यासाची प्रवृत्ति उदय पावून वाढत गेली,' अशीं कारणमीमांसा थोर पराक्रमी संन्यास-प्रवृत्तीच्या गळ्यांत आजच्या युगांत बांधली जाणें स्वाभाविक आहे, सोपें आहे. तथापि आपण ही गोष्ट नजरेआड करतां कामा नये कीं, मानवाच्या ज्ञानशक्तींत जी शक्यता आहे, त्या शक्यतेचें शिखर, ज्ञानाचें उंचांत उंच शिखर गांठून तेथें अस्तित्वाच्या श्रेष्ठतम सत्याचा पूर्ण साक्षात्कार त्यांनीं संपादन केला, आणि या साक्षात्काराच्या प्रभावामुळें त्यांनीं त्याला अनुरूप असा संन्यासमार्ग स्वीकारला व तो स्वीकारण्याचा साधकांना संदेश दिला. व्यवहार दृष्टीनें विचार करतां, मानवाच्या पूर्णतेला संन्यासी मनोवृत्ति आजहि एक आवश्यक गोष्ट आहे असें दिसेल; आणि मानवाच्या पूर्ण विकासाला साहाय्यक म्हणून नव्हे तर, स्वतंत्रपणें देखील संन्यासाची इष्टता व श्रेष्ठता प्रतिपादणें तोपर्यंत अटळ आहे, जोपर्यंत मानव आपली बुद्धि, आपली वासना-विकारांची रूढ जीवनसरणि, भोगैकपरायण, निर्बुद्ध, नित्य जुलुम करणाऱ्या पशुत्वाच्या दास्यांतून मुक्त करीत नाहीं.
आम्ही संन्यासाचा मार्ग थोर पराक्रमी मानीत असलों तरी आम्हाला संन्यासाचें ध्येय एकांगी वाटतें. संन्यासी किंवा जडवादी एकांगी जीवन आम्हाला इष्ट वाटत नाहीं. आम्हांला त्याहून महान् व पूर्णतर जीवन साधावयाचें आहे, म्हणून संन्यासी व जडवादी सिद्धांतांहून महान् व पूर्णतर सिद्धांत आम्ही प्रतिपादन करूं इच्छितों. आम्हांला हें मान्य आहे
पान क्र. ४५
कीं, ''एकमेवाद्वितीयं ब्रह्म'' या महान् वेदांती सूत्राला भारतीय संन्यासधर्म शिरोधार्य मानतो. परंतु ''सर्वं खलु इदम् ब्रह्म'' हें ''एकमेवाद्वितीयम् ब्रह्म'' या सूत्राइतकेंच वेदांती सूत्र आहे; व हीं दोन्ही सूत्रें सारखींच शिरोधार्य आहेत ही गोष्ट या संन्यासधर्मानें दृष्टिआड केली आहे. दुसऱ्या सूत्राच्या प्रकाशाच्या साह्यानें पहिल्या सूत्राचें वाचन व मनन शांतपणें व सावकाशीनें जितकें करावयास हवें तितकें संन्यासधर्मीयांनी केलें नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. उंच उंच ठिकाणीं देवाधिदेव, परमात्मा, पुरुषोत्तम (एकमेवाद्वितीयम् ब्रह्म) आहे, त्याला भेटण्यासाठीं उंच उडी घेण्याची तीव्र भावनोत्कट आकांक्षा मानवाचें हृदयांत वागणें अवश्य आहे हें संन्यासधर्मानें ओळखलें. परंतु हा परमात्मा, हें ब्रह्म आपल्या उंच ठिकाणावरून खालीं वांकून, स्वतःचें दर्शन ज्यांत आहे त्या विश्वाला, त्या आपल्या साकार आत्म्याला, विश्वरूपाला नित्य पोटाशीं धरून असतें या गोष्टीकडे त्या धर्माचें दुर्लक्ष झालें. विश्वातीत ब्रह्म विश्वरूप ब्रह्माशीं नित्य जोडलेलें आहे. विश्व, जडाच्या पोटीं आहे, आणि जड, ब्रह्माच्या पोटीं आहे. विश्वातीत ब्रह्म (आत्मा), विशुद्ध आत्मा म्हणून प्रत्ययास येतें हें ब्रह्माचें आत्मविषयक सत्य संन्यासधर्मानें ओळखलें, अनुभविलें. परंतु जडांतला ब्रह्माचा भाव त्याला नीट आकलन झाला नाहीं. प्राचीन वेदांती महापुरुषांनीं ब्रह्माची समग्र उंची पूर्णतेनें ओळखली होती व त्याबरोबर त्याचा समग्र विस्तार, त्याचा समग्र समावेशक धर्म देखील पूर्णतेनें ओळखला होता. परंतु संन्यास धर्मीयांना ब्रह्माच्या समग्र उंचीचें पूर्ण आकलन झालें तरी त्याच्या समग्र विस्ताराचें आकलन झालें नाहीं. असो. आजवरच्या सिद्धांतांहून जो पूर्णतर सिद्धांत आम्हाला मांडावयाचा आहे, तो मांडतांना मानवी जीवन ऊर्ध्वगतीच्या दृष्टीनें शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेनें जें कार्य केलें आहे त्याला कमी लेखण्याचा प्रमाद आमच्या हांतून घडतां कामां नये. भौतिक जडवादानें परमात्म्याचें हेतू कमी अधिक पूर्ण करण्याची जी मोठी कामगिरी नकळत केली आहे, ती आपण पाहिलीच आहे. संन्यास धर्मानें मानवी जीवनाची जडवादाहून कितीतरी अधिक व अधिक श्रेष्ठ अशी सेवा केली आहे. तेव्हां जडवादाप्रमाणें संन्यासवादालाहि आपण धन्यवाद दिले पाहिजेत. अंतिम सुसंवादी जीवनाचा म्हणून जो सिद्धांत आम्ही मांडणार आहोंत त्यांत भौतिक शास्त्रांतील सत्य गोष्टी आणि खरोखरी उपयुक्त अशा गोष्टी काळजीनें अंतर्भूत करणार आहों. या शास्त्राचीं आजचीं रूपें व सूत्रें
पान क्र. ४६
बरीचशीं किंवा सर्वच्या सर्व बाजूला ठेवावीं लागलीं किंवा मोडतोड करून वापरावी लागलीं तरी त्यांतील उपयुक्त व सत्य गोष्टी आम्ही अवश्य जपून ठेवूं. आर्यांच्या भूतकालीन आध्यात्मिक संपत्तीचा जो वारसा आमच्यापर्यंत आला आहे त्या वारशाची वहिवाट करतांना, सत्याची व उपयुक्त गोष्टींची जपणूक करण्याचें तत्त्व ज्या काळजीनें आम्हीं भौतिक शास्त्राला लावणार आहों, त्याहिपेक्षां अधिक काळजीनें तें तत्त्व या आमच्या आध्यात्मिक संपत्तीला लावणें आमचें कर्तव्य आहे.
पान क्र. ४७
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.