दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण चोविसावें

 

जडतत्त्व

 

जडतत्त्व, (अन्न) ब्रह्म आहे असें ज्ञान त्याला झालें.

- तैत्तिरीय उप० ३.२

 

आतां आम्हांला, आमच्या बुद्धीला ही गोष्ट पटली आहे कीं, जीवन हें मूर्तिमंत अनाकलनीय स्वप्न नव्हे, तर सर्वव्यापी दिव्य सत्तेचें महान् स्फुरण आहे, महान् स्पंदन आहे. या जीवनाच्या पायाचा, या जीवनाच्या तत्त्वाचा थोडाबहुत भाग आम्हांला दिसत आहे; आमची नजर वरती लागली आहे. उंच उंच चढण्याची जीवनाची अंतर्गत शक्ति मोठी आहे; तिचा वास्तवांतील विक्रम पहाण्यासाठीं आमची नजर वरतीं लागली आहे; शेवटीं जीवन दिव्य फुलोऱ्यानें फुलून जाणार आहे, तिकडे उंचांत उंच स्थानाकडे आमची नजर लागली आहे -- आम्हांला उंच चढलेलें जीवन, दिव्यतेनें फुललेलें जीवन दिसणार आहे, अशी आमची निश्चिति आहे -- तरीपण, सर्वांच्या खालीं असणारें एक तत्त्व, आम्हीं अद्यापि फारसें विचारांत घेतलेलें नाहीं -- हें तत्त्व म्हणजे जड-तत्त्व होय. या जडतत्त्वावर जीवन उभें आहे, एखाद्या स्तंभावर उभें असावें त्याप्रमाणें -- किंवा असें म्हणतां येईल कीं, जडतत्त्वांतून जीवन वरतीं येतें; जसा पुष्कळ शाखा असलेला वृक्ष त्याला पोटांत सामावणाऱ्या एखाद्या बीजांतून वर यावा, तसें माणसाचें मन, प्राण, शरीर या भौतिक तत्त्वावर अवलंबून असतात; जीवनाला फुलोरा येतो त्याचें कारण, जाणीव; सच्चिदानंदाची चित् किंवा जाणीव. ही चित्, चेतना, जाणीव मनाचें रूप घेते -- विस्तृत क्षेत्र व्यापते, उंच स्थानें चढून जाते; तिचें मूळ सत्यस्वरूप, अतिमानसिक जीवनाच्या विशालतेंत अंतर्भूत असतें -- या आपल्या मूळ सत्य स्वरूपाच्या शोधार्थ, मूळ चैतन्याची चेतना (जाणीव) मनाच्या रूपांत जडांतून वर येऊन जे विस्तृत व्यापक होण्याचे, उंच चढण्याचे प्रयोग करीत राहते, त्या प्रयोगांमुळें जीवन फुलतें हें खरें असलें, तरी शरीररूपी घरकुल आणि जडद्रव्याचा पाया यांचाहि

 

पान क्र. ४३०

 

जीवनाच्या विकासाशीं घनिष्ठ संबंध आहे यांत संशय नाहीं. जीवनाच्या विकासाचें स्वरूप आणि गती ही, शरीर आणि जडतत्त्व यांजवरहि अवलंबून आहे, असें स्पष्ट दिसतें. शरीराचें महत्त्व उघड आहे; मनुष्यप्राणी इतर प्राण्यांच्या पेक्षां वरतीं चढला आहे याचें कारण हें कीं, दिवसेंदिवस वाढणाऱ्या मानसिक प्रकाशाला आंत घेऊन, त्याला मदत करणारें शरीर आणि मेंदु माणसाला दिला गेला आहे, किंवा त्यानें स्वत: विकसित केला आहे म्हणा -- त्याचप्रमाणें मनुष्य स्वतःच्या स्वाभाविक मर्यादांपलीकडे चढून जाऊन, पूर्ण दिव्य जीवन -- दिव्य मानवता -- केवळ विचारांत आणि आंतर व्यवहारांत नव्हे, तर बाह्य व्यवहारांतहि प्रकट करणार आहे -- आजच्या प्रकाशापेक्षां उच्चतर प्रकाश आंत घेऊन, त्याला मदत करील असें शरीर, मनुष्य विकसित करील किंवा निदान असलेल्या शरीराकडून नवा श्रेष्ठ प्रकाश आंत घेऊन, त्याला मदत करण्याचें कार्य होण्याजोगी, शरीराच्या क्रियाशक्तींत कांहीं व्यवस्था करील, तरच वर वर्णिलेली दिव्य मानवता तो अंतर्बाह्य व्यवहारांत प्रकट करूं शकेल. आमच्या मानवी जीवनांतून हें दिव्य जीवन आजच्या मानवांत जर विकसित होणार नसेल, तर अशी एक शक्यता आहे कीं, जीवन ज्या अपेक्षा निर्माण करून राहिलें आहे, त्या अपेक्षा अनाठायी आहेत; जीवनाचा आम्ही घेत होतो तो अर्थ खोटा आहे व तो टाकून दिला पाहिजे; पार्थिव जीव सच्चिदानंदप्राप्तीसाठीं आत्म-विलयासच तयार झाला पाहिजे; मन, प्राण, शरीर यांचा सर्वस्वीं त्याग करून शुद्ध अनंतांत त्यानें परत जावें, त्यांत विलीन व्हावें हा एकच सच्चिदानंदप्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा आहे; ही एक शक्यता. दुसरी अशी शक्यता आहे कीं, मनुष्य हा दिव्य जीवनाचें ईश्वरी साधन नाहीं, त्याला जी प्रगतीची शक्ति आहे, दुसऱ्या सर्व पार्थिव प्राण्यांपेक्षां त्यांवेगळें विशिष्ट स्थान देणारें, जाणीवपूर्वक प्रगति करण्याचें जें सामर्थ्य त्याला आहे, त्या सामर्थ्याला एक नियत निश्चित मर्यादा आहे -- आणि ज्याप्रमाणें इतर जीवांना मागें सारून जीवनाच्या आघाडीवर तो आपल्या वैशिष्ट्याने आला आहे, त्याप्रमाणें त्याहून वेगळा प्राणी त्याला बाजूला सारून, त्याची आघाडीवरची जागा घेईल -- आणि तो नवा प्राणी दिव्य जीवनाचें ईश्वरी साधन होईल.

शरीर ही प्रथमपासूनच आत्म्याची मोठी अडचण मानली गेली आहे. आत्म्याच्या आध्यात्मिक प्रवासांत शरीर हें आत्म्याला सारखें अडखळायला लावतें आणि शरीराच्या खडकावर आपटून, आत्म्याची साधनारूपी नाव

 

पान क्र. ४३१

 

फुटते, असा प्रथमपासूनच शरीरासंबंधींचा आत्मोन्नतिपरायणांचा आक्षेप आहे. आध्यात्मिक कृतार्थता हें ज्यांचें ध्येय आहे आणि ज्यांना तें ध्येय लवकर मिळवावेंसें वाटतें, ते विश्वाच्या या जडतत्त्वाला, जड शरीराला निषिद्ध गोष्टींच्या यादींत घालून, दुसऱ्या सर्व वस्तुंपेक्षां जड शरीराला जास्त घृणित लेखून, या शरीरामुळें विश्वाचा आपल्याला उबग येतो असें म्हणतात. शरीर हें अंधकारमय ओझें आहे, हें आपल्याला सहन होत नाहीं अशी अध्यात्म-साधकांची तक्रार असते; शरीर हें हट्टीपणानें जड, ग्राम्य विषयांच्या मागें लागणारें आहे, असा त्यांचा सारखा धोसरा असतो आणि म्हणून अशा शरीराच्या बंधनांतून सुटका या दृष्टीनें तें संन्यासाचा आश्रय करतात. शरीराची कटकट मिटवावी या हेतूनें या साधकांनीं, शरीर हें सत्य नाहीं, जड विश्व सत्य नाहीं असें म्हणून त्यांचें अस्तित्व -- खरे अस्तित्व नाकारलें आहे; त्याची भ्रमांत गणना केली आहे. जडाला बहुतेक धर्मांनीं पापमूळ म्हणून शाप दिला आहे आणि धार्मिक सत्य, आध्यात्मिकता यांची कसोटी, शारीर जीवनाचा त्याग किंवा विरक्तपणें तें कांहीं काळ (एक जन्मापुरतें फार तर) कंठीत राहणें हीच ठरविली आहे. प्राचीन धर्मसंप्रदायांत जडासंबंधानें अधिक सहिष्णुता व अधिक खोल विचार आढळून येतो; कठीण कलियुगांत जो दुःखभार उचलावा लागतो, त्यामुळें आत्म्याचे हाल होतात, यांतून कधीं सुटेन असें वाटून तो उतावळा होतो -- असे हाल, अशी उतावळी प्राचीन धर्मसंप्रदायांच्या काळांत कोणाच्या अनुभवास आली नसेल : निदान आजच्या असहिष्णुतेचें उतावळीचें चिन्ह प्राचीन संप्रदायांत आढळत नाहीं : त्यांनीं शारीरजीवन आणि आत्मजीवन यांत अर्वाचीनांप्रमाणें भयंकर भेद मानला नाहीं : पृथ्वी ही माता आहे, स्वर्ग हा पिता आहे असें म्हणून त्यांनीं पार्थिव आणि अ-पार्थिव जीवनाचें महत्त्व सारखें लेखलें आहे; दोन्हींबद्दल तितकाच आदर, तितकेंच प्रेम प्रकट केलें आहे; पण प्राचीनांच्या रहस्यमय धर्मरीती आम्हांला गूढ आणि अनाकलनीय होऊन बसल्या आहेत -- त्यांचा विशेष विचार करणें आम्हीं सोडून दिलें आहे : आम्ही कोणी अध्यात्मवादी असूं, कोणी जडवादी असूं -- आम्हीं सर्वांनीं, जीवनाचा अवघड प्रश्न, जीवनाची निरगांठ उकलण्याचा प्रयत्न न करितां ती एका झटक्यानें तोडण्याचा, एका झटक्यानें जीवनत्याग करण्याचा मार्ग पसंत केला असून, जीवन त्यागून शाश्वत आनंदाच्या, निर्वाणाच्या किंवा शांतीच्या आश्रयाला पळून जाण्यांत आम्ही समाधान मानूं लागलों आहों.

 

पान क्र. ४३२

 

शरीर वा जड भौतिक तत्त्व, यांच्याशीं जें भांडण आम्ही अध्यात्मवादी भांडत आहों, तें भांडण अध्यात्माची शक्यता आम्हांत दिसूं लागल्यापासून सुरू झालें आहे असें नाहीं, तें भांडण जुनेच आहे : प्राणशक्ति, जीवनशक्ति जडांतून वर आली, तेव्हांपासूनच जडाचें आणि प्राणाचें भांडण सुरू झालें; प्राणशक्ति आणि जड भौतिक तत्त्व यांचें कांहीं जमेना; भौतिक तत्त्व वा देहतत्त्व हलविल्याशिवाय हालायचें नाहीं, त्याच्यांत नेणीव आमूलाग्र भरलेली, त्याचे अणु परमाणु एकमेकांपासून अलगपणें राहणारे, त्यांना स्वभावत: एकत्र राहण्याचा कंटाळा, कोणाकडून कांहीं कामासाठीं एकत्र जोडले गेले तर त्यांची वृत्ति, त्यांची प्रकृति तुटून फुटून अलग होण्याची व त्यांच्या जोडण्यानें बनलेला आकार तोडून टाकण्याची; भौतिक तत्त्वामध्यें स्वयंगतिशून्यता, नेणीव आणि अणु-विघटन या तीन शक्ती आहेत; प्राणशक्तीला, आपले विविध व्यवहार म्हणजेच प्राणयुक्त आकारांचे जीवपेशीचेच कमी अधिक टिकाऊ संयोग व समवाय वरील तीन शक्तींशीं झगडून करावे लागतात. या झगड्यांत प्राणशक्तीचा अखेर पराभव होतोसा दिसतो, जडतत्त्वाचा विजय होतोसा दिसतो -- कारण मरण म्हणजे प्राणाचा पाडाव होऊन त्याचें परत जडतत्त्व बनणें. जडांतून जीवन बाहेर आल्यावर सुरू झालेला हा झगडा, जीवनांतून मन वर आल्यावर अधिकच तीव्र होतो; जीवन (प्राण) आणि देह (जडतत्त्व) दोघांशींहि मनाचें भांडण असतें; या दोहोंच्या मर्यादा मनाला जाचक होतात; जडाची स्थूलता आणि गतिशून्यता, प्राणाची वासनामयता आणि दुःखमयता यांचा मनाला सारखा जाच होत असतो -- या गोष्टी, त्याला जडाचा आणि प्राणाचा कमी अधिक अंकित करतात आणि या दास्याविरुद्ध त्याला झगडावें लागतें; या झगड्यांत मनाला शेवटीं थोडाबहुत विजय मिळतो : (मिळतोच अशी खात्री मात्र देतां येत नाहीं) हा विजय अर्थातच पूर्ण नसतो, एकांगी असतो; शिवाय हा विजय मिळविण्यासाठीं मनाला फार नुकसान सोसावें लागतें; मनाच्या विजयांचें स्वरूप असें असतें; प्राणाच्या वासना मन हतबल करतें, दडपून टाकतें, मारूनहि टाकतें; शरीराची शक्ति कमी करून टाकतें; शारीर समतोल बिघडवितें -- आणि हें सर्व करून आपला मानसिक व्यवहार वाढवितें, आपली नैतिक पातळी उंच करतें. या झगड्याच्या व्यवहारांतच मनाला जीवनाविषयीं संताप येतो, शरीराची घृणा येते आणि जीवन व शरीर यांना सोडचिठ्‌ठी द्यावी आणि विशुद्ध नैतिक

 

पान क्र. ४३३

 

वा बौद्धिक अस्तित्व आपलेंसें करावें अशी विरक्ति मनाला उत्पन्न होते. मनापलीकडेहि अस्तित्व असल्याची जाणीव मनुष्याला झाली, म्हणजे त्याचें विसंवादाचें व झगडयाचें क्षेत्र वाढतें; मनहि नकोसें होतें; प्राण व शरीर यांच्या जोडीला मन बसवून, ही त्रयी दुष्ट सैतानाची, दोषमय दुःखमय विश्वाची आणि पातकी वासनामय मांसपिंडाची मदतनीस आहे, असा तिच्यावर आम्ही आरोप करतो आणि तिची संगत निषिद्ध ठरवितो. आमच्या सर्व दुःखाला कारण मन आहे असा सिद्धांत करून, आत्मा आणि त्याचीं व्यवहाराचीं साधनें (मन प्राण शरीर) यांच्यामध्यें आम्ही वितुष्ट उभें करतों, युद्ध माजवितों आणि या युद्धांत, मन-प्राण-शरीराच्या लहानशा घरकुलांत कोंडलेल्या आत्म्याला, आपलें कोंडमारा करणारें अडचणीचें लहान घरकुल टाकून देऊन, परत आपल्या मूळ अनंत क्षेत्रांत जाण्यानेंच मोकळें वाटणार आहे, त्यांतच आत्म्याचा खरा विजय आहे असा पक्ष आम्ही घेतों. आमच्या दृष्टीनें विश्व म्हणजे विसंवादाची व कलहाची मूर्ति आहे; आणि आम्ही असें मानूं लागलों आहों कीं, या विश्वाच्या गोंधळांतून निघावयाचें, तर कलहाची व विसंवादाची परिसीमा करून विश्वाशीं सर्व संबंध तोडण्यानें, अखेरची काडीमोड केल्यानें आमचें इष्ट साधेल, अन्यथा साधणार नाहीं.

पण यांत आमचा गैरसमज आहे, आमच्या पुढील जीवनाचा प्रश्न अशानें सुटत नाहीं -- त्या प्रश्नाला आम्हीं बगल दिल्याप्रमाणें तें होतें; आणि आम्हीं वर ज्या पराभवांचा आणि विजयांचा उल्लेख केला आहे, ते पराभव आणि विजय खरे नव्हेत, केवळ दर्शनी आहेत, केवळ आभास आहेत. जडतत्त्व प्राणशक्तीचा पाडाव करते ही गोष्ट खरी नाहीं; मरण ही घटना तडजोडीची आहे -- जीवन अखंड चालू राहावें यासाठीं मरण या घटनेचा उपयोग केला जातो. मनाचा प्राणावर वा जडावर जो थोडाबहुत विजय होतोसा दिसतो, तोहि खरा विजय नव्हे : मनाच्या ज्या शक्ती आहेत, त्यांपैकीं केवळ कांहीं थोड्या शक्तींचा अल्पसा विकास, प्राण व शरीर यांना दाबून दडपून मन करतें -- पण प्राण व शरीर यांचा चांगला उपयोग करून घेणें मनाला कित्येक बाबतींत शक्य असून, तसा उपयोग करून न घेतल्यानें, चांगल्या उपयोगावरच ज्या इतर शक्तींचा योग्य विकास अवलंबून असतो, त्या त्याच्या शक्ती अविकसित राहतात -- हा मनाचा पराजयच आहे. अशीच गोष्ट व्यक्तीच्या आत्म्याची आहे; हा आत्मा, मन-प्राण-शरीर या त्रयीवर खरोखरीचा विजय न मिळवितां,

 

पान क्र. ४३४

 

त्याजवर या त्रयीचा जो रास्त हक्क आहे तो अमान्य करून आणि त्याचें जें कर्तव्य आहे तें टाकून पळून जाण्यांतच ''विजय'' मानतो; हा वास्तविक त्याचा पराजयच आहे : चैतन्यानें, आत्म्याच्या आत्म्यानें ज्यावेळीं विश्वाचा आकार धारण केला, विश्वाच्या अंतरांत वसति केली त्यावेळीं जें कार्य करावयाचें पत्करलें, तें कार्य, आपलें कर्तव्य टाकून व्यक्तीचा आत्मा पळतो यांत कसला त्याचा विजय? त्याच्यापुढचा प्रश्न कायमच राहतो, ईश्वराचा विश्वांतील विकास-परिश्रम कांहीं थांबत नाहीं; जोपर्यंत परिश्रमाचें इच्छित फळ मिळालें नाहीं व जीवनाच्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर मिळालें नाहीं, तोपर्यंत तो प्रश्न सुटला असें म्हणतां येणार नाहीं, तोपर्यंत ईश्वराला परिश्रम हे करीत रहावेच लागणार; आमच्या दृष्टीनुसार सच्चिदानंद हा, विश्वाचा आरंभ, मध्य आणि अंत सर्वकांहीं असल्यानें आणि त्याच्या अस्तित्वांत, प्रकृतींत शाश्वत आणि मूलभूत तत्त्वें म्हणून कलह आणि विसंवाद या गोष्टी असणें अशक्य असल्यानें -- या दोन गोष्टींचें विश्वांतील अस्तित्व आमच्या दृष्टीनुसार हें ध्वनित करतें कीं, जीवनाच्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर मिळण्यासाठीं, कलह आणि विसंवाद यांचा अंतिम अंत होण्यासाठीं, परिश्रमांची आवश्यकता आहे; प्राणशक्तीला जडतत्त्वावर खरा विजय मिळणें म्हणजे प्राणशक्तीला शरीराचा पूर्ण स्वातंत्र्यानें, पूर्ण आणि उत्तम उपयोग करतां येणें हा होय; प्राणावर व शरीरावर मनाला खरा विजय मिळणें म्हणजे प्राणशक्तीचा आणि देहाचा मनाला पूर्ण स्वतंत्रपणें आणि पूर्णतेनें उत्तम उपयोग करतां येणें हा होय; त्याचप्रमाणें मन-प्राण-शरीर या त्रयीवर आत्मतत्त्वानें खरा विजय मिळविणें म्हणजे या त्रयीचा आपल्या इच्छेप्रमाणें आत्मतत्त्वानें पूर्ण जाणिवेनें पूर्ण ताबा घेणें होय; आमच्या दृष्टीनुसार हा शेवटला (आत्मतत्त्वाचा) विजय सिद्ध झाला, तरच दुसरे विजय खरोखरी शक्यतेच्या क्षेत्रांत येतील, अन्यथा येणार नाहींत; हे विजय म्हणजे जीवनाच्या प्रश्नाचें, सर्व विसंवादाचा अंत करणारें असें समाधानकारक उत्तर असून त्यासाठीं परिश्रमांची आवश्यकता आहे. हे विजय पूर्णतया कसे शक्य आहेत, हें समजण्यासाठीं अगोदर जडतत्त्वाच्या पोटीं सत्य वस्तु काय आहे याचा शोध आम्हीं घेतला पाहिजे; मौलिक ज्ञानाच्या पाठीमागें लागून मनाचें, आत्म्याचें, प्राणाचें (प्राणमय जीवनाचें) अंतर्गत सत्य आम्हीं जसे शोधून काढलें आहे, तसें तें जडतत्त्वाचेंहि शोधून काढणें, आमच्या उद्दिष्टासाठीं आम्हांला आवश्यक आहे.

 

पान क्र. ४३५

 

एका अर्थानें जडतत्त्व, जडद्रव्य हें खोटें आहे, त्याचें अस्तित्व मिथ्या आहे; याचा अर्थ, आमचें जडासंबंधाचें आजचें ज्ञान, आजची कल्पना, आजचा अनुभव यांत जडविषयक सत्य नाहीं; आम्ही सर्वव्यापी अस्तित्वाच्या -- सद्‌वस्तूच्या पोटांत आहों आणि तेथें हालचाल करीत आहों, त्या अस्तित्वाचा आमच्या ज्ञानेंद्रियांशीं कांहीं संबंध येतो, हा विशिष्ट संबंध - ही विशिष्ट संबंधाची घटना -- आमच्या आजच्या ज्ञानाचा, कल्पनेचा व अनुभवाचा विषय असते आणि ही घटना, हा संबंध म्हणजे कांहीं जडविषयक सत्य नव्हे -- संशोधन करून भौतिक शास्त्र जेव्हां अशा निर्णयाला येतें कीं, जड हें शक्तीनें धरलेलें रूप आहे, शक्तीचे नानाविध आकार म्हणजे जडद्रव्य आहे, तेव्हां त्याला एक सर्वव्यापी मौलिक सत्य सांपडलें आहे असें म्हणतां येतें; तसेंच तत्त्वज्ञान आपल्या संशोधनानें जेव्हां या निर्णयाला येतें कीं, आमची जी जाणीव आहे त्या जाणिवेला द्रव्याचा देखावा दिसतो, या देखाव्याला आम्ही जडद्रव्य म्हणतो; वस्तुत: एकच एक सत्य वस्तु आहे आणि ती वस्तु म्हणजे आत्मा, चैतन्य, शुद्ध ज्ञानमय सत्ता होय अशा निर्णयाला तत्त्वज्ञान येतें तेव्हां भौतिक शास्त्राच्या सत्यापेक्षां अधिक महान्, अधिक पूर्ण, अधिक मौलिक असें सत्य त्याला सांपडलें आहे असें म्हणतां येतें. आतां प्रश्न असा येतो कीं, शक्तीनें जडतत्त्वाचें रूप कां घ्यावे, 'शक्तीचे प्रवाह' याच रूपांत तिनें कायमचें कां राहूं नये; तसेंच जें शुद्ध चैतन्य आहे, त्यानें चैतन्याच्या विविध अवस्था, विविध आनंद याच रूपांत कायमचें न राहतां दर्शनी दिखाऊ जडतत्त्वाचें रूप घेणें पसंत कां करावें? जडतत्त्वाचें रूप शक्तीला किंवा चैतन्याला येणें हें मनाचें कार्य आहे, असा एक पक्ष आहे; मनांतील विचार वा क्रिया, वस्तूंचा जड आकार बनवीत तर नाहींच, पण त्याचें ज्ञानदेखील मनाला प्रत्यक्षपणें होत नाहीं, संवेदनेची मदत होते तेव्हां कोठें मनाला आकाराचें ज्ञान होतें; तेव्हां, मन हें शक्तीला वा चैतन्याला जडतत्त्वाचें रूप देत नसून, ही क्रिया संवेदनेची आहे असा दुसरा पक्ष आहे; अर्थात् हा पक्ष असें म्हणतो कीं, संवेदनाशील मन तीं रूपें बनवितें, जी त्याला दिसतात (असें भासतें आणि विचारशील मन या रूपांवर विचाराची क्रिया करतें, विचारानें त्यांत कमी अधिक करतें. परंतु हा व्यवहार करणारें मन हें व्यक्तीचें देहधारी मन असूं शकत नाहीं. जड-रूपांची सृष्टि, व्यक्तीच्या मनाकडून होऊं शकत नाहीं; पृथ्वीचें अस्तित्व हें मानवी मनाचें कार्य नव्हे; कारण पृथ्वीच्या

 

पान क्र. ४३६

 

अस्तित्वांतून हें मानवी मन उदय पावतें. विश्व हें केवळ आमच्या मनांचाच व्यापार आहे, विश्व आहे तें आमच्या मनांत आहे, तें कांहीं बाहेर नाहीं असें आम्हीं म्हटलें, तर आमच्या मनांचा गोंधळ दाखविणारी ती एक गोष्ट होईल -- कारण ती सर्वस्वी खोटी गोष्ट आहे. भौतिक विश्व आम्हां मानवांच्या पूर्वी होतें आणि आम्ही मानव पृथ्वीवरून नाहींसें झालों किंवा आमचें वैयक्तिक मन अनंतांत विलीन होऊन गेलें, तरी भौतिक विश्व असणार. तेव्हां मनाकडे विश्वाचें जनकत्व द्यावयाचें, तर तें मन, आमचें मानवी वैयक्तिक मन असूं शकणार नाहीं; त्याकरितां विश्वमनाची कल्पना करावयास हवी. हें विश्वमन विश्वरूप झालें आहे, विश्वरूपांत विश्वमनाची जाणीव आमच्या जाणिवेच्या खालच्या प्रांतांतील आहे; अर्थात् अर्धनेणीव ही 'नेणीव' या स्वरूपाची आहे, असें आम्हांला भासतें; परंतु विश्वमनाचें अंतरंग, हें आमच्या जाणिवेच्या वरच्या प्रांतीं असलेल्या अतिमानसिक जाणिवेनें युक्त आहे -- अशा प्रकारच्या विश्वमनानें विश्वाचें रूप आपल्या निवासाकरितां निर्माण केलें आहे. अतिमानसिक जाणिवेनें युक्त असें विश्वमन हें विश्वाच्या पूर्वीं होतें आणि विश्वानंतर असणार (आमच्या मनासारखें तें नव्हे) -- या अतिमानसिक जाणिवेच्या विश्वमनानें, विश्वव्यापक संवेदनेच्या साधनानें आपल्या स्वतःच्या पोटीं आकाराआकारांचें संबंध निर्माण केले आणि याप्रमाणें भौतिक विश्वाची सुव्यवस्था अस्तित्वांत आणली. विश्वाच्या निर्मितीची ही कल्पना एवढें सांगतें कीं, विश्वाचें जडतत्त्व हें विश्वमनाच्या अतिमानसिक जाणिवेचें कार्य आहे. परंतु, या जाणिवेनें आपल्या विश्वकार्याकरितां मूळ पाया म्हणून जडतत्त्व जें निर्माण केलें तें कोणत्या रीतीनें, कोणत्या प्रक्रियेनें निर्माण केलें हें ही कल्पना सांगत नाहीं.

ही प्रक्रिया समजण्यासाठीं आपण अगदीं मुळाकडे गेलें पाहिजे. मूळ सत्ता (जाणीवयुक्त सत्ता) क्रियाशील झाली म्हणजे ती जाणीवयुक्त शक्ति होते. ही शक्ति आपले व्यापार मूळ सत्तेच्या जाणिवेपुढें ठेवते; त्या मूळ सत्तेचीं, अस्तित्वाचीं विविध रूपें हेंच त्या व्यापारांचें स्वरूप असतें. ज्याअर्थीं एकच एक जाणीवयुक्त सत्ता मूलत: अस्तित्वांत आहे आणि शक्ति हें केवळ या सत्तेचें कार्य, क्रिया, व्यापार आहे, त्याअर्थीं या शक्तीचें, या व्यापाराचें फळ, मूळ जाणीवयुक्त सत्तेचीं विविध रूपें हेंच असणार, दुसरें कांहीं असूं शकत नाहीं. यावरून जडतत्त्व, जडद्रव्य

 

पान क्र. ४३७

 

हें चैतन्याचा (मूळ जाणीवयुक्त सत्तेचा) प्रकार आहे, आकार आहे, दुसरें कांहीं नाहीं हें उघड आहे. चैतन्याचा हा आकार आमच्या इंद्रियांना ज्या प्रकारें भासतो, ज्या प्रकारें दिसतो, तो प्रकार मनाच्या विभाग करण्याच्या क्रियेनें अस्तित्वांत येतो. विश्वाचा सर्व देखावा या विभाजनधर्मी मनामुळें निर्माण होतो. जाणीवयुक्त शक्तीचें कार्य प्राण-व्यवहार (जीवन) आहे आणि या प्राण-व्यवहाराचें कार्य भौतिक आकार आहे हें आपण पाहिलें आहे; या भौतिक रूपांत गुप्त असलेलें जीवन त्यांतून प्रथम वर येतें, तें नेणीवयुक्त शक्ति, जडशक्ति या रूपानें; पुढें तें विकसित होत होत, मनाचा आविष्कार करतें -- मनाच्या रूपानें मूळ जाणिवेचाच आविष्कार जीवन आपणांतून करतें; ही जाणीवच शक्तीचा आत्मा होते -- अर्थात् ही जाणीव अव्यक्त असतांना देखील शक्तीच्या पोटीं अस्तित्वांत होतीच. मन हें अतिमानसाचें, अर्थात् मूळ स्व-साक्षिक ज्ञानाचें गौण कार्य आहे, कनिष्ठ क्रियाशक्ति आहे; प्राणशक्ति ही या अशा मनाचीं कामें करणारी साधनरूप शक्ति आहे. मूळ जाणीव किंवा चित् अतिमानसाच्या द्वारां खालीं उतरून मनाचें रूप घेतें, मूळ जाणिवेची शक्ति (किंवा तपस्) अतिमानसाच्या द्वारां खालीं उतरून प्राणाचें रूप घेते. अतिमानसांत मनाचें श्रेष्ठ सत्य आहे, त्या सत्यापासून मन विभक्त होतें व त्याचें (मनाचें) साधन जो प्राण (जीवन) त्यालाहि आपली विभक्तपणाची दीक्षा देतें; अर्थात् जीवन विभागलेलें आहे असा देखावा उत्पन्न करतें. तसेंच आपल्या साधनरूप प्राणशक्तींत गुप्त होऊन, प्राण-व्यवहारांत मन अवचेतन होते -- आणि मग भौतिक विश्वांत ज्या क्रिया या मनाकडून घडतात, त्या जड शक्तीनें घडतात असा देखावा तें उत्पन्न करतें. तेव्हां, जडतत्त्वांत जें ज्ञानशून्यत्व, जें स्वयं-गतिशून्यत्व, अणु अणु अलग राहण्याचें जें तत्त्व आहे, तें सर्व मनाच्या विभाग करण्याच्या आणि स्वत: जीवनापोटीं गुप्त होण्याच्या क्रियेंतून निघालें आहे -- आमचें विश्व मनाच्या या व्यवहारांतून अस्तित्वांत आलें आहे. सृष्टिनिर्मितीच्या कार्यांत खालीं उतरतांना अतिमानस शेवटीं जी क्रिया करतें, ती मन बनते; मूळ जाणीवयुक्त शक्ति, मनाच्या खालीं येण्यानें निर्माण केलेल्या अज्ञानाच्या परिस्थितींत जें कार्य करते, तें प्राणमय जीवन बनतें, त्याप्रमाणें जाणीवयुक्त मूळ शक्तीचें वर उल्लेखिलेलें कार्य घडल्यानें, मूळ जाणीवयुक्त सत्ता जें अखेरचें रूप घेतें, तें रूप म्हणजे जडद्रव्य होय. जडतत्त्व हें मूळ जाणीवयुक्त एकच एक सत्ता-

 

पान क्र. ४३८

 

द्रव्य आहे, विश्वमनानें त्यांत देखाव्यापुरतें विभाग, अलग अलग तुकडे करण्याचें काम केलेलें आहे -- मूळ सत्ताद्रव्याच्या अनंत पोटांतच हें विभक्तीकरणाचें काम केलें गेलें आहे. आमचें वैयक्तिक मन हें विभक्तीकरण आपल्यापरीनें पुन्हां करीत असतें, या विभक्त तुकड्यांत वैयक्तिक मन निवास करतें. तथापि चैतन्याची मूळ सत्तेची एकता, मूळ शक्तीची एकता, मूळ जडतत्त्वाची एकता, यांत वैयक्तिक मनाच्या किंवा *विश्वमनाच्या विभजनक्रियेनें कांहीं तफावत होत नाहीं, कांहीं कमीपणा येत नाहीं -- तिजमुळें ती एकता रद्द होण्याचें अर्थात्‌च नांवहि नको.

एक अविभाज्य सत्तेचें, अस्तित्वाचें -- हें दर्शनी, व्यवहारी विभजन तरी कां केलें जातें? मूळ सत्तेची एकता कायम ठेवून, तिच्या पोटीं अनेकतेचें तत्त्व व्यवहारापुरतें कामास आणण्याचें ठरल्यावर, या तत्त्वाची अंतर्गत शक्ति तिच्या शेवटच्या परिसीमेपर्यंत कार्यान्वित करावयाचें काम मनाकडे येतें; आणि हें काम अलगपणा आणि विभागणी यांच्या आश्रयानेंच होणें शक्य आहे. यासाठीं प्राणशक्तीच्या पोटीं मन उडी घेतें. अनेकतेच्या निवासासाठीं रूपें, आकार बनविण्याकरितां ही उडी घेतें -- अस्तित्वाच्या सर्वव्यापी एकतत्त्वाला स्थूल भौतिक द्रव्याचें रूप मन देतें, तत्पूर्वींचें एकतत्त्वाचें शुद्ध रूप व सूक्ष्म रूप मनापुढें असलेल्या कार्याला उपयोगी नसतें, म्हणून स्थूल भौतिक द्रव्याचें रूप विश्वव्यापी सत्तत्त्वाला देणें मनाला भाग पडतें. विश्वव्यापी सत्तत्त्व किंवा सत्ताद्रव्य शुद्ध,

-------------------------

*विश्वमन हें अतिमानसिक जाणिवेचें मन आहे असें म्हटलें आहे. अतिमानस वेगळें आणि विश्वमन वेगळें. विश्वमनाला अधिमानस म्हणतां येईल. अतिमानसावर प्रत्यक्ष अवलंबून असलेलें, त्याच्या खालचें क्षेत्र अधिमानसाचें क्षेत्र होय -- अधिमानसापासून अज्ञानाच्या क्षेत्राला आरंभ होतो. आमच्या परिचयाचें जें मन आहे, त्याला संयोग व संयुक्त पदार्थ करण्याची अपार शक्ति आहे -- पण मूळ निर्मिति त्याजकडून होत नाहीं. सर्व सृष्ट रूपांची मूळ निर्मिति शरीर प्राण मन यांच्या पलीकडील अनंतांत होते. येथें अनंतपणें विभागलेलें जें मूळ द्रव्य, त्याच्या अति-सूक्ष्म विभागांच्या अणूंच्या, परमाणूंच्या संयोगीकरणानें, एकत्रीकरणानें अनंतानें सुचविलेल्या नमुन्याप्रमाणें ओबडधोबड रूपें तयार केलीं जातात. विश्वांतील रूपांच्या शाखा खालीं आहेत, विश्वाचें मूळ वर आहे, असें ऋग्वेदांत म्हटलें आहे तें वरील वस्तुस्थितीला उद्देशून म्हटलें आहे.

 

पान क्र. ४३९

 

सूक्ष्म आणि स्थूल या तीन स्वरूपांत, तीन जाणीव प्रकारांचा विषय होत असतें. शुद्ध जाणीव (सच्चिदानंदाची शुद्ध जाणीव) आणि विश्वाचें सत्ताद्रव्य यांचा संबंध-संपर्क झाला, म्हणजे स्वतःच्या शुद्ध शाश्वत सत्तेचाच कमीअधिक संपर्क झाला अशी अनुभूति शुद्ध जाणिवेला होते. सूक्ष्म संवेदनाशील जाणिवेचा आणि त्याच विश्व-द्रव्याचा संबंध आला, कीं हें विश्वद्रव्य लवचिक असून, जाणीवयुक्त मूळ सत्तेचें आविष्करण करण्याचें कार्य तें सुलभतेनें व विविधतेनें करूं शकतें अशी अनुभूति सूक्ष्म संवेदनाशील जाणिवेला येते. पण हे दोन्ही प्रकार आपापल्यापरी ठीक असले, तरी जें कार्य स्थूल संवेदनशील मन करूं शकतें, तें दोन्ही प्रकारच्या जाणीवांकडून घडूं शकत नाहीं -- अनेकतेच्या तत्त्वाची अंतर्गत शक्ति शेवटच्या परिसीमेपर्यंत व्यक्त करावयाची कामगिरी मनाकडे असल्यानें, त्याचा आणि शुद्ध विश्वतत्त्वाचा संपर्क झाला कीं मनाला या संपर्काला विशिष्ट दर्शनी स्वरूप द्यावें लागतें; तें हें कीं, हें विश्वतत्त्व कायमपणें अनेक पदार्थांच्या रूपांत वावरत आहे आणि या अनेक पदार्थांपैकीं प्रत्येक पदार्थ कठीण, स्थिर स्वरूपाचा आहे, लवचिक सूक्ष्मद्रव्याच्या स्वरूपाचा नाहीं किंवा मूळ शुद्ध सत्ताद्रव्याच्या शाश्वत सत्य स्वरूपाचा तर नाहींच नाहीं. मनाचा त्याच्या विषयांशीं संपर्क झाला म्हणजे जी अनुभूति मनाला येते, त्या अनुभूतीला संवेदना असें आम्ही म्हणतों. अनेकतेच्या संपूर्ण सिद्धीसाठीं ही संवेदना, बाह्य संवेदना असावी लागते, स्थूल असावी लागते, संपर्कविषयाची बाह्य वास्तवता सहज पटण्यासारखी, स्थायी भौतिक असावी लागते. तेव्हां, सच्चिदानंद अतिमानसाच्या द्वारां खालीं उतरलें, मनांत आणि प्राणांत त्यानें वसति केली कीं त्याचें शाश्वत शुद्ध ''द्रव्या''चें स्वरूप जाऊन, त्याला अशाश्वत भौतिक स्थूल द्रव्याचें स्वरूप अपरिहार्यपणें येतें. आपलें उच्च क्षेत्र सोडून खालच्या क्षेत्रांत जाऊन, अस्तित्वाचा, जीवनाचा अनुभव घ्यावयाचा व अनेक, अनंत जीव आणि त्यांच्या अलग अलग ज्ञानकेद्रांतून, जाणीव-केंद्रांतून विश्वांतील वस्तुंचा, घटनांचा अनुभव घेणें अशी त्या अनुभवाची पहिली श्रेणि असावयाची -- असा निर्णय एकदां सच्चिदानंदानें घेतला, कीं वर सांगितल्याप्रमाणें, त्याला म्हणजे त्याच्या शुद्ध ''द्रव्याला'' भौतिक द्रव्याचें स्वरूप येणें अपरिहार्य होतें. वस्तुजाताचा पाया जें चैतन्य, आत्मा आहे, तिकडे वळून आतां आपण या विश्वांतील द्रव्याची चिकित्सा करूं -- विश्वगत वस्तूंच्या आध्यात्मिक मुळाकडे आपण

 

पान क्र. ४४०

 

वळलों म्हणजे अगदीं शुद्धातिशुद्ध अवस्थेंतील विश्वद्रव्य, हें शुद्ध जाणीवयुक्त सत्ता आहे, स्वयंभू, स्वभावत: स्वतःचें ज्ञान असणारी, ''मी स्वयंभू सत्ता आहे'' असें तादात्म्याचें ज्ञान असणारी सत्ता आहे, असें आपल्या अनुभवास येतें -- या अतिशुद्ध स्थितींत स्वयंभू सत्ता आपल्या जाणिवेनें स्वतःकडे एक जाणिवेचा विषय म्हणून बघूं लागलेली नसते. शुद्ध ज्ञानमय सत्ता ही विश्वद्रव्याची अगदीं मूळ अवस्था. यानंतर त्याच्या खालीं अतिमानसाचा प्रांत असतो; येथें तादात्म्याचें, एकरूपतेचें, एकतेचें आत्म-ज्ञान पूर्वींसारखेंच कायम असतें. अतिमानसाच्या आत्म-विषयक जाणिवेचें सार व त्याच्याकडून जें स्वतःच्या निमितीचें कार्य घडतें, त्या कार्याला अवश्य असणारा प्रकाश, तादात्म्यज्ञानांतच असतो. मात्र येथें जें निमितीचें कार्य करावयाचें असतें, त्यासाठीं अतिमानस हें शुद्ध सत्तेला आपल्या क्रियाशील, क्रियाप्रवण जाणिवेचा विषय आणि विषयी करीत असतें -- ज्ञान ज्ञेय व ज्ञाता अशी त्रिपुटी येथें उत्पन्न होते. एक ज्ञाता वा अनेक ज्ञाते, एक ज्ञेय वा अनेक ज्ञेयें अशी एकता आणि अनेकताहि ज्ञेय आणि ज्ञाता यांच्या संबंधांत अतिमानसांत अस्तित्वांत येते. अतिमानसिक श्रेष्ठ-ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. १) सर्वसमावेशक, समग्रबोधात्मक २) ज्ञातृ-ज्ञेय-भेदात्मक, किंवा अ-समग्रबोधात्मक. समग्रबोधात्मक ज्ञानांत शुद्ध सत्ता आपल्या पोटांत स्वत: सर्वच्या सर्व ज्ञानविषय असते व स्वत: सर्वच्या सर्व ज्ञाता पण असते. ज्ञातृ-ज्ञेय-भेदात्मक (अ-समग्रबोधात्मक) ज्ञानांत शुद्ध सत्ता, एक ज्ञानविषय किंवा अनेक ज्ञानविषय (पदार्थ) या रूपानें केंद्रीय शुद्ध सत्तेच्या समोर ठेवण्यांत येते; येथें विशाल वर्तुल व त्याचें केंद्र, अशी ज्ञानक्षेत्राची वांटणी करण्यांत येऊन, केंद्रांत (दर्शन केंद्रांत) शुद्ध सत्ता ही ज्ञाता, साक्षी, पुरुष या रूपांत एका अंशानें स्थिर होते आणि आपल्या ज्ञानवर्तुलाच्या परिघाच्या पोटांत आपलाच दुसरा अंश, एक किंवा अनेक पदार्थ या रूपानें ज्ञानविषय म्हणून दूर उभा करते. वरील समग्र आणि असमग्र ज्ञानक्रिया एकाच वेळीं होत असते. जी अ-समग्र बोधात्मक किंवा ज्ञातृ-ज्ञेय-भेदात्मक अशी जाणीव असते, तिच्यांतून पुढें मनाची प्रक्रिया निघते. या प्रक्रियेंत व्यक्ति हा ज्ञाता असतो आणि तो स्वत:च्या विश्वव्यापी अस्तित्वाच्या कोणत्याहि रूपाला वेगळेपणानें आपला ज्ञानविषय म्हणून ओळखतो -- मन दिव्य अवस्थेत असतें तेव्हां या प्रकियेबरोबरच दुसरी प्रक्रियाहि घडत असते -- व्यक्ति आणि व्यक्तीचा ज्ञानविषय दोघांची एकता, दोघांच्या अस्तित्वाचा अभेद, हा या दुसऱ्या पूरक

 

पान क्र. ४४१

 

ज्ञानप्रक्रियेचा पुकार असतो. या दोन प्रक्रिया एकाच वेळीं घडत असल्यानें दिव्य मनांत भेदाचें ज्ञान हें ज्ञात्याला सर्वस्वीं 'खरें ज्ञान' असें भासतच नाहीं, एक क्षणभरहि त्याचा असा गैरसमज होत नाहीं. ही झाली अतिमानसाच्या पोटांतील दिव्य मनाची गोष्ट. मन दिव्यता टाकून भेदनिष्ठ बनलें, म्हणजे ज्ञानविषय आणि ज्ञाता यांच्या एकीकरणाचें जें कार्य जाणीवपूर्वक घडत होतें व अभेद स्थापित होत होता तें कार्य घडत नाहीं -- व्यक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत अशी या भेदनिष्ठ मनाची जाणीव असते आणि येथें व्यक्तीचा व्यक्तीशीं वा वस्तुशीं संपर्क घडला असतां, मनाला बाह्य विषयाची संवेदना झाली असें आपण म्हणतो. अर्थात् ही संवेदना विकृत ज्ञान देणारी व अज्ञानपूर्ण अशी असते, ही गोष्ट आपण लक्षांत ठेवणें अवश्य आहे. या मानसिक संवेदनेंत भेदाच्या जाणिवेला प्रमुख स्थान असतें; अभेदाच्या, एकतेच्या जाणिवेला गौण स्थान असतें. या संवेदनेवर विचारशील मन विचार करून, भेद ही गोष्ट गौण आहे आणि अभेद, एकता ही गोष्ट प्रमुख आहे, अशा निर्णयाला येतें. मूळ एकतेंतून जी अनेकता उदय पावली (अ-दिव्य मनाच्या व्यापारानें) ती अनेकता अ-दिव्य मनाच्या विचारशील चिकित्सेनें पुन: आपलें गौण स्थान घेते आणि एकतेला, अभेदाला पूर्वींप्रमाणें प्रमुख स्थान बहाल करते. तथापि अभेद हा स्थिरपणें प्रस्थापित व्हावयाचा, तर अ-दिव्य मनाच्या वर अतिमानसाच्या क्षेत्रांत पाऊल टाकावें लागतें हें सांगणें नकोच. या सर्व विवरणाचा इत्यर्थ हा कीं, द्रव्य (अर्थात् भौतिक द्रव्य) हें जाणीवयुक्त मूळ सत्तेच्या, संवेदनशील मनाला घडणाऱ्या संपर्काचें रूप आहे. या मूळ सत्तेची ज्ञानक्रिया, ज्ञानप्रक्रिया हें मनाचें स्वरूप आहे.

मनाला, त्याच्या संवेदनेला जाणीवयुक्त सत्तेचें द्रव्य जें अनुभवास येतें, तें त्याच्या स्वाभाविक समग्रतेनें, एकतेनें अनुभवास येत नाहीं, तर मनाच्या स्वभावधर्मानुसार या द्रव्याची विभागणी मन करीत असतें. अगदीं सूक्ष्म कण किंवा अणू या रूपानें, मनाच्या संवेदनेला मूळ सत्ताद्रव्य भासतें; हे कण किंवा अणू किंवा बिंदू जोडून जोडून मन त्यांचे समूह, समुदाय बनवितें -- आणि या कणांत आणि कणांच्या गणांत विश्वमन उडी घेऊन स्थायिक होतें. सत्य-कल्पनामय अतिमानसाचें कार्यकारी अंग, या नात्यानें हें विश्वमन स्वाभाविक निर्माणशक्तीनें भरलेलें आणि निर्मितिप्रवण असतें. कणांत आणि कणांच्या गणांत, त्याला ज्या ज्या

 

पान क्र. ४४२

 

अनुभूती येतात, त्या त्या अनुभूतींचा उपयोग करून त्यांतून जीवनशक्ति उत्पन्न करणें, हा त्याचा (विश्वमनाचा) स्वभावधर्म असतो; सर्वमय सत्तावान् मूळ पुरुष सच्चिदानंद, स्वविषयक सर्व अनुभूती घेऊन त्यांतून शक्तीचे विविध प्रकार -- स्वतःच्या जाणीवयुक्त मूळ निर्मितिसामर्थ्याचे विविध प्रकार -- बनवितो, तशीच ही विश्वमनाची गोष्ट आहे; आपल्या सर्वगत, सर्वव्यापी अस्तित्वाचे, कणागणिक आणि कणगणागणिक जे अनेक दृष्टिबिंदू, दृष्टिकोन विश्वमनाला मूळ सत्ताद्रव्याच्या विभागणीनें प्राप्त होतात, त्यांतून विश्वव्यापी जीवनाचे तितकेच दृष्टिकोन तें तयार करतें : जड द्रव्याच्या पोटांत लाभलेले कणांचे वा अणूंचे दृष्टिकोन, अणुगत अणुमित अस्तित्वाचीं रूपें जीवनद्वारां घडविण्यासाठीं विश्वमन उपयोगांत आणतें -- हीं रूपें, जीवनानें स्वभावतःच भरलेलीं असतात आणि तीं बनविण्याची प्रेरणा देणाऱ्या संकल्पयुक्त मनाकडून त्यांचें शासन होत असतें. हे अणुपुरुष किंवा या अणु-वस्तू स्वतःच्या स्वभावधर्मानुसार गण करतात; हे गण, ते घडणाऱ्या गुप्त जीवनानें आणि ते घडण्याची प्रेरणा देणाऱ्या या गुप्त संकल्पयुक्त शासनधर्मी मनानें, व्यापलेले असतात -- या गणांपैकीं प्रत्येक गण, आपलें स्वतंत्र वेगळें व्यक्तिगत अस्तित्व आहे अशी अवास्तव कल्पना मिरवीत असतो. अशा प्रत्येक स्वतंत्र वस्तूंत किंवा जीवयुक्त अस्तित्वांत, मन अप्रकट किंवा प्रकट, गुप्त किंवा उघड वावरत असून, या मनाच्या स्वरूपानुसार त्याजमध्यें किंवा तिजमध्यें 'जड यांत्रिक मी' अथवा 'जाणीवयुक्त मी' रहातो व त्या वस्तूला किंवा जीवाला आधार देतो. 'जड यांत्रिक मी' हा जडशक्तीचा 'मी' असतो; त्याजमध्यें अस्तित्व टिकविण्याची इच्छाशक्ति निःशब्द आणि बंधनगत असली, तरी आपल्या कार्यापुरती पूर्ण समर्थ असते; जाणीवयुक्त मी हा मनोमय व स्वतःला जाणणारा असा असतो; बंधनमुक्त, ज्ञानयुक्त स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याच्या उद्देशानें अस्तित्व टिकविण्याची त्याची इच्छाशक्ति कृतिशील अशी असते.

जडद्रव्याची कथा वरीलप्रमाणें आहे. जड अणू अस्तित्वांत येतात ते विश्वमनाच्या क्रियाविशिष्टतेमुळें अस्तित्वांत येतात; विश्वमनाच्या व्यापाराचा स्वभावधर्म या जड अणूच्या मुळाशीं आहे; जडद्रव्य मूळ आहे, शाश्वत आहे आणि त्याचा विशिष्ट प्रकारचा मूळ शाश्वत नियम, जड अणु अस्तित्वांत आणतो अशी वस्तुस्थिति नाहीं. जड द्रव्य हें उत्पन्न केलें जातें -- मुळांत जड कांहीं नाहीं. या जड द्रव्याच्या

 

पान क्र. ४४३

 

उत्पत्तीसाठीं मूळ अनंत जाणीवयुक्त सत्तेचें (सत्ताद्रव्याचें) आत्यंतिक विभजन, अत्यंत सूक्ष्म तुकडे करणें अवश्य होतें; अनंताचा अनंतांश हाच जडाचा पाया वा मूळारंभ आहे. विरळ, अति विरळ आकाशतत्त्व हा जडाचा मूळारंभ, मूळ आधार म्हणून असूं शकतें व आहे; पण तें इतकें सूक्ष्म आहे कीं आत्मतत्त्वांत व त्याच्यांत फरक करणें अवघड पडतें; त्याच्या अतिसूक्ष्मतेमुळें भौतिक द्रव्य म्हणून, रूपात्मक सत्ता म्हणून, त्या आकाशतत्त्वाचें वर्गीकरण करणें ही गोष्ट आजच्या आमच्या ज्ञानाला तरी अशक्य आहे. आमच्या दृष्टीला दिसूं शकणारा, अणुसंघ वा साकार अणु घ्या आणि तो फोडून फोडून त्याचे निराकार मूळ सारभूत अणू करा -- सत्तेची अतिसूक्ष्म कणांची धूळ असें रूप तुमच्या साकार अणूला येईल असे त्याचे तुकडे करा -- असें केलें तरी अत्यंत सूक्ष्म कां होईना पण अणुभूत जडद्रव्यच तुमच्या खटाटोपानें निर्माण होईल; कारण हा खटाटोप करणारें मन आणि जीवनशक्ति (प्राणशक्ति) यांचा स्वभावधर्मच त्यांना, जडअणूच्या पलीकडे असणारें, अजड चैतन्यक्षेत्र, अणुशून्य सर्वशून्य शुद्ध एकरस जाणिवेचें क्षेत्र गांठूं देत नाहीं : साकार अणूचे अतिसूक्ष्म अंश, साकार अणूप्रमाणें स्थिर नसतील -- तरीपण ते अत्यंत अस्थिर निराकार अणुसारखे साकार होण्याच्या प्रयत्नांत राहतील; शक्तीच्या प्रवाहाचा आघात सारखा होत असल्यानें, निराकार अणू पुन: पुन: आकाराला येतील, पुन: पुन: निराकार होतील एवढेंच; ते कांहीं निरणुत्व पावणार नाहींत, तें कांहीं चैतन्यांत विलीन होणार नाहींत; कारण मन आणि प्राण हे त्या अणूंचे जन्मदाते आहेत आणि ते त्यांना चैतन्यांत विलीन करूं शकत नाहींत. ज्यामध्यें अणू-अणूंचा संयोग नाहीं असा द्रव्याचा अणूविरहित क्षेत्रविस्तार, आणि अवकाशांत अणूंची वांटणी झाल्यानें जें सह-अस्तित्व शक्य होतें, त्या सह-अस्तित्वावेगळें सह-अस्तित्व, या गोष्टी शुद्ध अस्तित्व, शुद्ध द्रव्य यांच्या संबंधांत वास्तव गोष्टी आहेत. या गोष्टी अतिमानसाच्या ज्ञानाच्या, त्याच्या कार्यकारी निर्मितिशील तत्त्वाच्या गोष्टी आहेत. विभजनशील मनाची निर्मिति करणारी, कल्पना ही वेगळी वस्तु आहे; अतिमानसिक ज्ञान आणि निर्माणतत्त्व (व्यापार तत्त्व) यांहून वेगळी वस्तु आहे; मन जेव्हां आपलें निर्माणकार्य करतें, तेव्हां या कार्याच्या पाठीमागें अतिमानसिक ज्ञान व निर्माणतत्त्व कार्यकारी असतें हें मनाला कळूं शकतें. जडद्रव्याच्या

 

पान क्र. ४४४

 

मुळांत जी सत्य वस्तु आहे, ती वरील अतिमानसिक ज्ञान आणि क्रिया होय. परंतु जडद्रव्य म्हणून ज्याला आम्ही नांव देतो, जें आमच्या दृष्टीला दिसतें, तें वेगळी वस्तु आहे -- तें शुद्ध अस्तित्व नव्हे, मूळ जाणिवेचा विस्तार नव्हे; (शुद्ध अस्तित्व हें अतिमानसिक ज्ञानरूप असतें आणि त्याचा विस्तार हा त्या ज्ञानाचा विस्तार असतो.) जडद्रव्य, प्राण आणि मन ही शुद्ध अस्तित्व आणि शुद्ध (ज्ञानमय) विस्तार यांच्याशीं एकरूप होऊं शकतात; पण ही एकरूपता स्थितिशील शुद्ध अस्तित्वाशीं वा शुद्ध विस्ताराशीं होऊं शकते -- हें शुद्ध अस्तित्व व विस्तार गतिशील होऊन, आत्म-अनुभूति व रूपात्मक सत्यनिर्मिति या क्रियांत, आपलें मूळ एकत्व कायम ठेवतात -- सर्व अनुभव व सर्व रूपे एकाचीच आहेत, ही जाणीव शुद्ध अस्तित्वाच्या व शुद्ध विस्ताराच्या क्रियाशीलतेंतहि कायम टिकते; तसें मन, प्राण, जडद्रव्य यांच्या व्यापारांत होऊं शकत नाहीं; त्यांच्या व्यापारांत अनेकतेचा प्रादुर्भाव होतो.

तेव्हां जड द्रव्यासंबंधानें आपल्याला पुढील सत्य मांडतां येतें : शुद्ध अस्तित्व हें ज्ञानमय, कल्पनामय आत्मविस्तार करतें, विश्वामध्यें हाच कल्पनामय शुद्ध-अस्तित्व-विस्तार द्रव्याचें किंवा जाणिवेच्या विषयाचें रूप धारण करतो; विश्वमन आणि विश्वप्राण आपल्या निर्मितिशील व्यापारानें, या मूळ ज्ञानमय ज्ञानविषयाला, मूळ कल्पनाद्रव्याला, अणुमय विभागणी व अणुमय संयोग या आपल्या क्रियांच्या द्वारां, आम्हीं ज्याला जडद्रव्य म्हणतो त्या द्रव्याचें रूप देतात. हें जडद्रव्य, मन आणि प्राण यांच्याप्रमाणें शुद्ध सत्ता किंवा ब्रह्मच असतें; ब्रह्मच आपलें आत्म-निर्मितीचें, आत्म-आविष्काराचें कार्य करतां करतां मन व प्राण यांच्या नंतर हें जडद्रव्याचें रूप घेतें. जाणीवयुक्त सत्ता (मूळ पुरुष) ज्या शक्तीनें युक्त असते, त्या शक्तीचा, तिचा मनानें योजलेला आणि प्राणानें बनविलेला आकार म्हणजे जडद्रव्य -- जडद्रव्याच्या पोटीं त्याचें वास्तव रूप जी जाणीव ती असते; ही जाणीव त्या जडद्रव्याला गुप्त असते, त्यापासून लपलेली असते; ही जाणीव स्वतःला आकार देण्याच्या कार्यांत तल्लीन होऊन, त्या आकारांत लपून स्वतःला त्या आकारापुरती विसरून जाते. जडद्रव्य वस्तुत: या स्वरूपाचें असल्यानें तें कितीहि ज्ञानशून्य वा संवेदनाशून्य दिसलें, तरी त्यांत दडलेल्या जाणिवेला, तिच्या आंतर अप्रकट अनुभूतीला तें वेगळ्या प्रकारें भासते -- गुप्त जाणिवेच्या संवेदनेचा विषय झालेला शुद्ध अस्तित्वाचा आनंद, हें रूप त्या

 

पान क्र. ४४५

 

जड द्रव्याला त्या गुप्त जाणिवेच्या दृष्टीनें असतें. हा आनंद त्या गुप्त जाणिवेला आपला भोग घेण्याची स्फूर्ती देऊन; या स्फूर्तीमुळें निर्माण झालेल्या वासनेच्या आकर्षणानें तिला प्रकट रूप घ्यावयास लावतो, तिला तिच्या गुप्त स्थानांतून वर आणतो. शुद्ध सत्ता द्रव्यरूपानें प्रकट झालेली, या सत्तेची शक्ति साकार झालेली, या सत्तेच्या अप्रकट आत्मजाणिवेनें प्रकट मूर्त रूपानें आत्म-अभिव्यक्ति केलेली, या सत्तेचा आनंद तिच्या स्वतःच्या जाणिवेला तिचा भोगविषय म्हणून तिच्यापुढें सतत उभा असलेला -- असा हा जडपदार्थ सच्चिदानंद नव्हे तर दुसरें काय आहे ! तेव्हां जडद्रव्य, जडपदार्थ हा सच्चिदानंद होय : मूळ सच्चिदानंदाला, त्याच्या अवतरणक्रमांत मन आणि मानसिक अनुभूति लाभली कीं या त्याच्या अनुभूतीला 'जड सच्चिदानंद' हा, मूर्त ज्ञान, क्रिया व अस्तित्वानंद यांचा साकार मूलाधार या रूपानें अनुभवास येतो.

 

पान क्र. ४४६

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates