दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

प्रकरण तेरावें

जाणीवशक्तीची अनन्य एकाग्रता व अज्ञान

 

      मूळ जाणिवेच्या शक्तीचा अग्नि पेटविला गेला, या अग्नींतून सत्य जन्मास आलें, सत्याचा नियम जन्मास आला; त्यापासून रात्र, रात्रीपासून अस्तित्वाचा प्रवाही सागर जन्मास आला.

- ऋग्वेद १०.१९०.१

 

      ब्रह्माचें सारभूत विश्वात्मक अस्तित्व पाहतां, तें एक आहे आणि अनेकहि आहे; एकता आणि अनेकता, एकमेकींना ज्ञात असतात आणि अनेकतेंत एकता अशी त्याची परस्परविषयक व्यवस्था असते; असें हें ब्रह्म सत्य दृष्टीनें एकत्व आणि अनेकत्व यांच्या पलीकडे असतें, या दोन अवस्था त्याच्या पोटीं असतात, दोन्ही अवस्था त्याला ज्ञात असतात; अशी वस्तुस्थिति असल्यानें अज्ञान जें आम्हांस अनुभवास येतें तें ब्रह्मांतील प्रधान अंग नसून, एक गौण घटना म्हणून उदयास येत असलें पाहिजे हें उघड आहे : ही घटना घडते कशी याचा विचार करतां हें स्पष्ट दिसतें कीं, अस्तित्वाच्या एकांगी ज्ञानावर, एकांगी क्रियेवर ब्रह्माची जाणीव एकाग्र व केन्द्रित होऊन ती आपल्या ज्ञानकक्षेंतून बाकी सर्व अस्तित्व आणि त्याचा व्यवहार बाहेर ठेवीत असली पाहिजे. ब्रह्म एकतेच्या आपल्या अवस्थेवर आपली जाणीव केन्द्रित करून, अनेकतेची अवस्था तिच्या कक्षेबाहेर ठेवतें, ठेवूं शकतें; आपल्या अनेकतेच्या अवस्थेंतील कोणत्याहि एका आत्म्याच्या क्रियेवर आपली जाणीव केन्द्रित करून तिच्या कक्षेबाहेर आपली सर्वज्ञता ठेवू शकतें; 'व्यक्तिगत आत्मा' या आपल्या स्वरूपांत तें स्वत:वर (व्यक्तिगत आत्म्यावर) जाणीव केन्द्रित करून, आपली मूळ एकता आणि अनेकतेंतील दुसरें सर्व व्यक्तिगत आत्मे, यांना तिच्या कक्षेबाहेर ठेवूं शकतें. हे दुसरे व्यक्तिगत आत्मे त्या व्यक्तिगत आत्म्याला अशारीतीनें वेगळे वेगळे, स्वतंत्र आत्मे भासतात; त्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या कक्षेबाहेर या सर्व

पान क्र. ५०४

 

व्यक्तिगत आत्म्यांचा व्यवहार असतो. अनन्य एकाग्रतेच्या या तीन दिशा होऊं शकतात; या तीनहि दिशांनीं अनन्य एकाग्रता करण्याचा सर्वसाधारण नियम प्रकृतीच्या अर्थात् क्रियाशील अस्तित्वाच्या शक्तीच्या पसाऱ्यांत कोठेंतरी असूं शकतो, कोठेंतरी येऊं शकतो : भेदनिष्ठ हालचालीवर भेदनिष्ठ क्रियाशील जाणिवेची अनन्य एकाग्रता, वर सांगितलेल्या तीनहि दिशांनीं होऊं शकते. अज्ञानाच्या उदयासंबंधानें ही उपपत्ति इतर उपपत्तींहून बरी असल्यानें आम्हीं ती स्वीकारली आहे. इतर कोणतीहि उपपत्ति केवळ स्वत:च्या बळावर अस्तित्वाच्या सर्व गोष्टींचें स्पष्टीकरण देऊं शकत नाहीं, सर्व गोष्टींशीं जुळत नाहीं, सर्व गोष्टी सामावून घेत नाहीं; पूर्ण ब्रह्म पूर्णता ठेवून अज्ञानाचा उगम होऊं शकत नाहीं; कारण पूर्णता स्वभावत:च सर्वज्ञता, सर्व-जाणीव असते. एक ब्रह्म घेतलें तर तें आपलें पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व ठेवून स्वतांतून ''अनेक'' बाहेर घालवूं शकत नाहीं; कारण ''अनेकाला'' जर तें स्वतांतून बाहेर ढकलील तर तें ''अनेक'' अस्तित्वांत टिकूं शकणार नाहीं; पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्वाचें असलेलें एक ब्रह्म फार तर विश्वक्रीडेपासून आपल्या जाणिवेंत कोठेंतरी अलग राहूं शकेल -- एवढ्यासाठीं कीं, व्यक्तिगत आत्म्यालाहि असें विश्वक्रीडेपासून अलग राहतां यावें. अनेकरूप ब्रह्म, त्याचें पूर्ण अनेकत्व घेतलें किंवा त्याचें प्रत्येक आत्म्यांतील अस्तित्व घेतलें, तरी तें स्वत:चें एकत्व किंवा अनेकतेंतील इतर आत्मे, दृष्टीआड करूं शकेल हें शक्य नाहीं; कारण अनेकीभूत ब्रह्म याचा अर्थच असा आहे कीं, एकच दिव्य आत्मा अनेकांतील सर्वांचे ठिकाणीं आहे, तो व्यक्तिरूप झाला असला तरी त्या व्यक्तिरूप आत्म्याचें जाणीवयुक्त अस्तित्व इतर व्यक्तिरूप आत्म्यांच्या अस्तित्वांहून वेगळें झालेलें नाहीं, सर्व व्यक्तिरूप आत्म्यांचें जाणीवयुक्त अस्तित्व एका विश्वात्मतेंत आहे; व्यक्तिरूप आत्मा याप्रमाणें जाणिवेनें विश्वात्म्याशीं एकरूप असतो, आणि तो विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या मूळ एकच एक ब्रह्माशींहि जाणिवेनें एकरूप असतो. तेव्हां अज्ञान ही कांहीं आत्म्याच्या जाणिवेची, व्यक्तिरूप आत्म्याच्या जाणिवेची देखील प्रकृति नव्हे, स्वभावधर्म नव्हे; क्रियाशील जाणीवशक्तीकडून जेव्हां एखादी विशिष्ट गोष्ट घडवून आणणारी क्रिया घडते, आणि या क्रियेंत ती शक्ति मग्न होऊन सर्वथा आत्मविस्मृत होते, आत्म्याला विसरते, प्रकृतीची खरी पूर्णता विसरते, प्रकृतीचें पूर्ण सत्यस्वरूप विसरते, तेव्हां अज्ञानाचा उदय होतो. ही जी क्रिया अज्ञानोत्पादक

पान क्र. ५०५

 

म्हणून सांगितली ती सर्व अस्तित्वाची किंवा अस्तित्वाच्या सर्व शक्तीची असूं शकत नाहीं; कारण या पूर्ण अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या पूर्ण शक्तीचा स्वभावधर्म पूर्ण जाणीव हा असतो; एकांगी, अंशजाणीव हा नसतो. अज्ञानोत्पादक क्रिया ही अस्तित्वाची किंवा अस्तित्वशक्तीची पृष्ठगत, एकांगी हालचाल असून ती जाणिवेच्या आणि शक्तीच्या एकांगी पृष्ठगत क्रियेच्या व्यापांत बुडून गेलेली असली पाहिजे; कांहीं रचना करण्यांत अनन्य एकाग्रतेनें जाणिवेचें येथें कार्य होत असलें पाहिजे; या रचनेच्या कक्षेंत नसलेल्या, किंवा प्रकटपणें तेथें नसलेल्या सर्व गोष्टींचा या एकाग्र जाणिवेला सर्वथा विसर पडत असला पाहिजे. अज्ञान म्हणजे प्रकृतीनें आत्म्याला आणि विश्वाला (सर्वाला) हेतुपुर:सर विसरणें आहे : अज्ञानाच्या क्रियेंत प्रकृति हेतुत: आत्म्याला आणि सर्व वस्तुज्ञाताला बाजूला ठेवून देते, आपल्या पाठीमागें ठेवून देते; तिचा हेतु हा असतो कीं, अस्तित्वाच्या विशिष्ट पसाऱ्यांत, लीलेंत तिला जें कांहीं कर्तव्य असतें तें कर्तव्य, तिला एकनिष्ठतेनें करतां यावें.

      अस्तित्व अनंत आहे, त्याची जाणीव अनंत आहे; या अनंत अस्तित्वांत आणि जाणिवेंत तप, जाणिवेची एकाग्रता नेहमींच असते. ही एकाग्रता, केन्द्रितता, जाणीवशक्तीचा अंगभूत स्वभावधर्म आहे. या एकाग्रतेंत जाणीव स्वत्व एकत्र करून स्वतांवर स्वबुद्धीनें, स्वत:च्या अंतरांत सर्व लक्ष केन्द्रित करते; स्वतांवर लक्ष केन्द्रित करते त्याप्रमाणें स्वत:चा जो विषय असेल त्यावरहि आपलें लक्ष केन्द्रित करीत असते; जाणिवेचा स्वत:चा विषय हा वस्तुत: ती स्वत:च असते, तिचें स्वत:चें अस्तित्व असतें, किंवा त्या अस्तित्वाचें एखादें प्रकटन वा आंदोलन असतें. एकाग्रता चार प्रकारची आहे. सारनिष्ठ, एकतानिष्ठ, अनेकतानिष्ठ, भेदनिष्ठ. सारनिष्ठ एकाग्रतेंत जाणीव केवळ स्वत:चे ठिकाणीं तल्लीन असते, स्वत:च्या सारभूत भागावर तिचें सर्व लक्ष एकाग्र झालेलें असतें; ही एकाग्रता प्रकाशयुक्त असूं शकते, प्रकाशहीन आत्मविस्मृतियुक्तहि असूं शकते. अतिचेतन शांत अवस्था आणि अचेतन अवस्था ही या प्रकारची एकाग्रता असते. एकतानिष्ठ एकाग्रता ही सच्चिदानंदाची एकताप्रधान अवस्था होय. येथें भेदज्ञानाला गौण स्थान असतें. अतिमानसिक एकाग्रता असें या दुसऱ्या एकाग्रतेला नांव देतां येईल. तिसरी अनेकतानिष्ठ एकाग्रता ही अधिमानसिक एकाग्रता होय. या एकाग्रतेंत अनेकताज्ञान प्रधान असतें, अनेकतेबरोबर त्या अनेकतेचें एकत्र गौण रीतीनें नजरेसमोर ठेवण्यांत

पान क्र. ५०६

 

येतें.

      चौथी भेदनिष्ठ एकाग्रता; या एकाग्रतेंत अज्ञानाचा जन्म होतो. अज्ञानाचा खास स्वभावगुण म्हणजे ही चौथी एकाग्रता. येथें अस्तित्वाचें एखादेंच क्षेत्र, आंदोलनाचें एखादेंच क्षेत्र एकाग्र दृष्टीचा विषय असतें; या क्षेत्रावर, तें एक स्वतंत्र क्षेत्र आहे अशा भावनेनें, दृष्टि एकाग्र केलेली असते. अस्तित्वाच्या एखाद्या केन्द्रावर, अस्तित्वाच्या वस्तुस्वरूप झालेल्या एखाद्या केन्द्रावर, अस्तित्वाच्या वस्तुस्वरूप झालेल्या एखाद्या भागावर या भेदनिष्ठ एकाग्रतेंत सर्व लक्ष केन्द्रित झालेलें असतें. केवळ ब्रह्म, परात्पर पूर्ण ब्रह्म स्वत:च्या जाणिवेच्या या सर्व अवस्था एकत्र, एकाच वेळीं धारण करतें; तें एकच एक अविभाज्य अस्तित्व असतें, त्याची आत्मसंमुख दृष्टि एकाच वेळी आपलें सर्व अस्तित्व, आपल्या अव्यक्त अस्तित्वाच्या सर्व व्यक्त अवस्था पाहूं शकते आणि पाहते.

      जाणीवयुक्त अस्तित्वाचा हा खास स्वभावच म्हणतां येतो कीं, त्याचे ठिकाणीं विशिष्ट एकाग्रता असते. मूळ स्वतांवर किंवा स्वत:समोर असलेल्या विषयरूप बनलेल्या स्वतांवर, जाणिवेची एकाग्रता करणें हा जाणीवयुक्त अस्तित्वाचा खास धर्म असतो. जाणीव ही अनंत विस्तार पावली असेल, ती विखुरलेली असेल पण हा विस्तार, हें विखुरणें तिच्या पोटांत, तिच्या आधारानें झालेलें असतें. तिच्या शक्ती विखुरल्यासारख्या दिसतात, पण हें विखुरणें वस्तुत: एक प्रकारचें नियमबद्ध वांटप असतें; हें पृष्ठगत क्षेत्रांतील ''विखुरणें'' (दर्शनी विखुरणें) जें घडतें, तें पृष्ठाखालीं जाणिवेनें स्वेच्छेनें, एकाग्रतेनें स्वत:चें जें केन्द्रीकरण केलेलें असतें, त्या केन्द्रीकरणाच्या आधारानें घडतें, घडणें शक्य होतें. एकमात्र विषयी अथवा एकमात्र विषय, एकमात्र अस्तित्व-कक्षा अथवा एकमात्र आंदोलन-कक्षा यांजवर अनन्य एकाग्रतेनें जाणिवेनें बैठक घेणें याचा अर्थ, ती आपल्या सर्वगामी ज्ञानाला रजा देते, असा नव्हे, तर तपाचा, जाणिवेच्या आत्मकेन्द्रीकरणाचा ''अनन्य एकाग्रता'' हा एक प्रकार असतो एवढेंच. अनन्य एकाग्रतेनें एखादा विषय (स्वत:चें एखादें रूप) जाणिवेनें व्यापला म्हणजे तिचें स्वत:संबंधीचें बाकीचें ज्ञान ती मागें ठेवते; एकाग्रतेच्या विषयाखेरीज बाकीच्या गोष्टी जाणिवेला दिसत असून त्या तिला दिसत नाहींत अशाप्रकारें ती वागू शकते; अर्थात् अशी स्थिति असेल तेथें अज्ञान आहे असें मात्र आम्ही म्हणूं शकत नाहीं. जाणिवेनें अनन्य एकाग्रतेनें आपल्याभोंवतीं भिंत उभी केली, आणि स्वत:च्या आंदोलनांतील एका क्षेत्रांत, निवासांत कोंडून घेतलें, आणि या बंदीमुळें (या भिंतीमुळें)

पान क्र. ५०७

 

विश्वाचीं बाकीचीं क्षेत्रें, निवास आपल्याबाहेर आहे असा प्रत्यय तिला येऊं लागला म्हणजे तेथें स्वतःला मर्यादित करून काम करण्याचें तत्त्व जाणिवेनें स्वीकारलें असें म्हणतां येतें. या मर्यादातत्त्वांतून भेदनिष्ठ ज्ञान निघूं शकतें, आणि त्यांतूनच क्रमश: अज्ञान, परिणामकारक निखालस अज्ञान, भेदनिष्ठ ज्ञानाचा कळस म्हणून उदयास येऊं शकतें.

      मनोमय मनुष्याचे ठिकाणीं जाणिवेची अनन्य एकाग्रता कशा प्रकारची असते हें पाहिल्यास मर्यादातत्त्व आणि त्याचें व्यावहारिक परिणाम यांसंबंधानें आपल्याला कांहीं कल्पना येऊं शकेल. प्रथम ही गोष्ट नमूद करणें अवश्य आहे कीं, ''मनुष्य'' या शब्दानें मनुष्याचा जो भाग सामान्यतः दाखविला जातो तो त्याचा आंतर आत्मा नव्हे. त्याच्या जाणिवेची आणि शक्तीची एकीकृत भूत-वर्तमान-भविष्यकालीन दृश्य अखंड हालचाल ही सामान्यत: ''मनुष्य'' या शब्दानें दाखविली जाते. ही त्याची शक्ति  (आणि जाणीव) त्याचीं सर्व कामें करते, त्याचे सर्व विचार प्रसवते, भावना अनुभवते, असें आपणांस बाह्यत: दिसतें; ही त्याची कार्यकारी जाणीवयुक्त शक्ति हा, त्याच्या कालांकित अशा आंतर व बाह्य क्रियांच्या प्रवाहावर एकाग्र झालेल्या त्याच्या जाणीवशक्तीचा व्यापार असतो. या कालांकित शक्तिकार्यप्रवाहाच्या पाठीमागें त्याच्या जाणिवेचा सागर असतो. या सागराला बाहेरच्या प्रवाहाची पूर्ण माहिती असते; मात्र त्या प्रवाहाला सागराची ओळख नसते. पृष्ठगत शक्ति व तिचें सर्व कालांकित दृश्य कार्य हें अदृश्य असलेल्या शक्तीच्या सांठ्यांतून निवडून बाहेर दृश्यांत फेंकलेलें असतें. या बाहेर पाठविलेल्या शक्तीखेरीज बाकी सर्व शक्ति (जाणीवशक्ति) तिच्या पाठीमागें अदृश्य सागरासारखी पसरलेली असते. आंतर आत्मा, अतिचेतन, अवचेतन, आंतरचेतन आणि परिचेतन अस्तित्व (पुरुष) आणि या सर्वांना एकत्र बांधणारा चैत्य पुरुष किंवा खरा आत्मा (जीवात्मा) मिळून जाणिवेचा उपरिनिर्दिष्ट अदृश्य सागर होतो. या सागरांतून वर बाहेर आलेला शक्तिप्रवाह म्हणजे प्रकृतींतील पृष्ठगत बाह्य मनुष्य होय. त्यानें आपली जाणिवेची क्रियाशील शक्ति (तप) बाह्य क्षेत्रांत बाह्य कार्यांच्या विशिष्ट समूहावर अंशत: केन्द्रित केलेली असते; या बाह्यकेन्द्रित अंशाखेरीज बाकीची शक्ति तो मागें राखून ठेवतो. त्याला या शेष शक्तीचा प्रत्यय येत नाहीं, कारण तो बाह्य व्यापारांत मग्न होत असतो. बाह्यतः साकार न झालेलें त्याचें जाणीवयुक्त अस्तित्व जें असतें, तेथें त्या शेष शक्तीचा प्रत्यय अंधुकपणें तरी त्याला येत असला

पान क्र. ५०८

 

पाहिजे. अंतरंगांत, खोल ठिकाणीं त्याला स्वतःविषयीचें अज्ञान नसतें; वर जो पृष्ठगत व्यवहार त्याला करावयाचा असतो त्या व्यवहारासाठीं व त्या व्यवहाराच्या व्यापांत, त्याला स्वतःचा विसर मात्र पडतो; स्वतःच्या विशालत्वाचा विसर पडतो, खऱ्या स्वत्वाचा (गुप्त शक्तिसागराचा) विसर पडतो. पण हें लक्षांत घेणें अवश्य आहे कीं, बाहेर जें कार्य घडत असतें तें देखील, बाह्य शक्तिप्रवाह स्वतःच्या बळावर करीत नसून, तें कार्य वस्तुत: गुप्त शक्तिसागरच करीत असतो. बाह्य कार्याचा उगम त्या सागरांतून होत असतो; त्यानें वर केलेली बाह्य जाणीव-लहरी कांहीं बाह्य कार्य उभारीत नाहीं. कार्यमग्न, कार्यांतच जीवन जगणारी, कार्याखेरीज दुसरें कांहीं पाहण्यास असमर्थ झालेली अशी ही बाह्य-लहरी बाह्य कार्यासंबंधानें वेगळा विचार करीत असेल, (मी हें कार्य करते असा विचार करीत असेल) तर करो पण सत्य कांहीं त्या विचारांत नसतें. सत्य हें असतें कीं, अदृश्य शक्तिसागर, खरा आत्मा, पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व, अस्तित्वाची पूर्ण शक्ति हीच आंतील व बाहेरील सर्व कार्य करीत असते आणि हें सर्व जाणिवेनें करीत असते; तिचे ठिकाणीं अज्ञान मुळींहि नसतें. वरच्या लहरीसंबंधानें ही गोष्ट सांगणें अवश्य आहे कीं, तिला आंतील सागरासंबंधानें अज्ञान असलें, तरी हें अज्ञान अनिवार्य नसतें. तिच्या अंतरांत सर्व सागर असतोच; पूर्ण जाणीव बाजूला ठेवून ती आपलें काम करीत असते. त्या कामांत गढून जाऊन ती पूर्ण जाणिवेला पाठमोरी होत असते; व्यवहारापुरता, व्यवहारासाठीं हा तिचा विसर असतो. हा विसर, हें आत्मविषयक अज्ञान तिच्या ठिकाणीं स्वाभाविक बंधनकारक असें नसतें; तिच्या अनन्य एकाग्रतेचें स्वरूप या प्रमाणें पारमार्थिक (खरी) आत्मविस्मृति नसून, व्यवहारापुरती आत्मविस्मृति हें असतें; पण या आत्मविस्मृतीनें अज्ञान जन्माला येतें हें मात्र खरें.

      मनुष्य म्हणजे जाणिवेची आणि शक्तीची एकीकृत भूतवर्तमानभविष्यकालीन अखंड दृश्य हालचाल होय, असें आपण सामान्यत: समजतो, असें वर सांगितलें; आणि या बाह्य मनुष्याच्या आंतरस्वरूपाची, गुप्तशक्तिसागराची थोडीशी कल्पना वर दिली. आतां, या (बाह्य) मनुष्याची भूतवर्तमानभविष्यसंबंधीं स्थिति सांगावयाची आहे. मनुष्य हा वस्तुत: कालांकित जाणीवयुक्त शक्तीचा (तपाचा) अखंड व अविभाज्य प्रवाह असतो; तो वर्तमानांत जो व्यवहार करतो, तो व्यवहार करण्याची पात्रता भूतकालांतील त्यानें केलेल्या व्यवहारांतून त्याला लाभत असते;

पान क्र. ५०९

 

त्याचा भूतकालीन व्यवहार आणि वर्तमानकालीन व्यवहार, त्याचें भविष्य निश्चित करीत असतो; अशी वस्तुस्थिति असतां, तो वर्तमान क्षणांतच मग्न होऊन जगत असतो, क्षणांतून क्षणाकडे तो प्रवास करीत असतो. त्याचें भविष्य त्याच्या पृष्ठगत जाणिवेला अज्ञात असतें, त्याचें भूतकालीन अस्तित्वहि, स्मृतींतून काय थोडें ज्ञात होत असेल तेवढें खेरीज करून, त्याला अज्ञातच असतें. भूतकालीन अस्तित्व अंशत: त्याच्या स्मृतिगत ज्ञानाचा विषय होत असलें, तरी त्या भूतकालांत तो जीवन जगूं शकत नाहीं; स्मृतीनें त्याच्या पुढें केलेलें त्याचें भूतकालीन जीवन हें, वास्तविक जीवन नसून त्या जीवनाचें काल्पनिक छायाचित्र असतें; त्याचें भूतकालीन वास्तविक जीवन त्याच्या दृष्टीनें अस्तित्वांतून नाहींसें झालेलें, मरण पावलेलें असतें. पण त्याच्या पृष्ठगत अज्ञानग्रस्त जाणिवेपुरतें हें मरण असतें; त्याची खरी जाणीव, जी आंत असते तिला त्याचा भूतकालीन व्यवहार नष्ट झालेला असत नाहीं; आंतर जाणिवेला तो स्पष्ट दिसत असतो. भूतकालीन जीवन त्या जाणिवेनें धरून, संग्रह करून ठेवलेलें असतें; तिच्या क्षेत्रांत तें जिवंत असतें, कार्यकारी असतें; त्या जीवनाचीं फळें तयार असतात, तयार होत असतात; आंतर जाणीव बाह्य जाणिवेला मधून मधून स्मरणाच्या द्वारां हें भूतकालीन जीवन परिचित करून देते; शिवाय मनुष्याच्या भूतकालीन कर्माचीं, त्यानें गति दिलेल्या भूतकालीन कारणपरंपरेचीं फळें, त्याच्या भूतकालीन जीवनाचीं फळें आंत तयार असतात, किंवा होतात, तीं फळें आंतर जाणीव त्याला वरतीं वेळोवेळीं पाठवीत असते; आंतर जाणीव, भूतकालीन जीवन स्मृतिरूपानें वर पाठवून शिवाय फलरूपानेंहि तें वर पाठवीत असते. कर्मसिद्धान्तांतील कर्माचें तात्विक तर्कशुद्ध स्पष्टीकरण मनुष्याच्या आदर जाणिवेच्या उपरिनिर्दिष्ट व्यवहारांत मिळतें. ज्याप्रमाणें भूतकालीन जीवन आंतर जाणिवेला ''जिवंत'' असतें, त्याप्रमाणें भविष्यकालीन जीवनहि तिला ''जिवंत'' असूं शकतें, तिला भविष्याचें स्पष्ट ज्ञान असूं शकतें. आंतर पुरुषाचे ठिकाणीं कोठेंतरी असें ज्ञानक्षेत्र असतें कीं जेथें भविष्यविषयक ज्ञान येऊं शकतें. मागें पाहण्याची शक्ति जशी त्याला असते, तशी पुढें पाहण्याची शक्तिहि त्याला असते; तिन्ही कालांत अविभाज्यपणें, अखंडपणें जीवन जगणारें असें कांहीं तरी आंतरपुरुषांत असतें. या तीन कालांचें दर्शनी विभाग सर्व त्या पुरुषांशांत अविभक्तपणें दिसतात, भविष्यकालीन जीवन तेथें तयार असतें; केवल त्याचें प्रकटीकरण व्हावयाचें

पान क्र. ५१०

 

असतें, तें योग्य भविष्यकालांत होत असतें. तेव्हां मनोमय मनुष्य आंतर व्यवहार सर्व सोडून, बाह्य व्यवहारांत मग्न असतो ही एक गोष्ट व दुसरी गोष्ट ही कीं, तो बाह्य व्यवहारांपैकीं केवळ वर्तमानकालीन व्यवहारावर आपलें सर्व लक्ष केन्द्रित करून असतो. हें दोन प्रकारचें अनन्य केन्द्रीकरण मनुष्याचे ठिकाणीं आपणांस अनुभवयास मिळतें. पहिल्या केन्द्रीकरणानें घडून येणाऱ्या जाणिवेच्या, पुरुषाच्या मर्यादितपणांत दुसऱ्या केन्द्रीकरणानें भर पडते; पण त्यामुळें एक गोष्ट सोयीची होते ती ही कीं, पुरुष जें कार्य करतो त्याचा क्रम, दर्शनी क्रम सोपा होतो; कारण त्याचा संबंध कालाच्या अनंत प्रवाहाशीं राहत नसून, निश्चित अशा क्रमवारीनें येणाऱ्या व निघून जाणाऱ्या क्षणांशीं येतो.

      तेव्हां मनुष्याची पृष्ठगत जाणीव घेतली, तर मनुष्य क्रियादृष्टीनें, व्यवहारदृष्टीनें वर्तमानक्षणवर्ती मनुष्य असतो; तो भूतवर्ती नसतो, भविष्यवर्तीहि नसतो. भूतवर्ती मनुष्य या दृष्टीनें तो नष्ट झालेला असतो, भविष्यवर्ती या दृष्टीनें तो अस्तित्वांत यावयाचा असतो, आलेला नसतो; आपल्या भूतवर्ती अंश-मनुष्याबरोबर वर्तमानवर्ती मनुष्य स्मृतीनें संबंध जोडतो, आपल्या भविष्यवर्ती अंश-मनुष्याबरोबर तो अपेक्षेनें, आशेनें संबंध जोडतो; तिन्हीं कालांत अखंडपणें राहणारी अशी ''मी'' संवेदना त्याचे ठिकाणीं असते; पण ही संवेदना मानसिक केन्द्रीकरणनिष्ठ रचना असते; ज्यांत भूत, वर्तमान, भविष्य अस्तित्व समाविष्ट आहे असें, तात्विक, मूलभूत किंवा विस्तारित अस्तित्व, असें कांहीं ''मी'' चें स्वरूप नसतें. मी-च्या पाठीमागें असा विशाल आत्मा असल्याची अंतःस्फूर्त जाणीव मनुष्याचे ठिकाणीं असते. पण हा आत्मा मनुष्याच्या बाह्य क्षणवर्ती अस्तित्वाच्या खालीं, खोल ठिकाणीं एकरूप असा असतो; आणि ''मी'' च्या रूपान्तरांनीं त्या आत्म्याच्या स्वरूपांत कांहीं कमीअधिक होत नाहीं. क्षणवर्ती अस्तित्व हें मनुष्याचें खरें पूर्ण अस्तित्व नसतें; पृष्ठगत जीवनाच्या व्यवहारासाठीं व या जीवनाच्या मर्यादेंतच त्याचें व्यावहारिक महत्त्व असतें; तें क्षणवर्ती अस्तित्व सत्य असतें, पण बाकी अस्तित्वाच्या अज्ञानामुळें तें मर्यादित आणि विकृत होऊं शकतें; मनुष्याचें जाणीवयुक्त अस्तित्व, जीवन त्याचें जें पूर्ण खरें अस्तित्व असतें त्याला धरून चालविलें जात नाहीं; कारण या अस्तित्वाची त्याला (पृष्ठवर्ती क्षणवर्ती मनुष्याला) जाणीवहि नसते; त्याचें जीवन तो चालवितो तें अर्धे खरें, अर्धे खोटें ज्ञान, अर्थात् अज्ञान त्याला सांगेल तसें तो चालवितो. तथापि, त्याचा

पान क्र. ५११

 

खरा आत्मा त्याच्या पाठीमागें राहून सर्व कांहीं ठरवितो आणि नियंत्रित करतो; अशी वस्तुस्थिति असल्यानें, ज्ञान हेंच त्याच्या साकार जीवनाचा आकार निश्चित करीत असतें, असें म्हटलें पाहिजे. पृष्ठगत अज्ञान काय जें करतें तें एवढेंच कीं, त्याच्या जीवनाला आवश्यक अशी मर्यादा घालणारी बाह्य रेखा ठरवितें, आंखतें, आणि त्याच्या प्रस्तुत मानवी आयुष्यक्रमाला आणि त्याच्या प्रस्तुत क्षणाला अवश्य असा बाह्य रंग आणि वळण त्याच्या जाणिवेला आणि कृतीला ज्या गोष्टी देऊं शकतील अशा गोष्टी पुरवितें. जाणिवेचें अनन्य केन्द्रीकरण मनुष्याला बाह्य व्यवहारांत कोंडतें, बाह्य व्यवहारांतील केवळ क्षणवर्ती व्यवहारांत कोंडतें, त्याप्रमाणें तें त्याला प्रस्तुत जन्मांतील नांवांत (गुणांत) आणि आकारांत कोंडतें; प्रस्तुत जन्मापूर्वींचें त्याचें भूतकालीन जीवन त्याला अज्ञात असतें, प्रस्तुत जन्मानंतरचें भविष्यकालीन जीवनहि त्याला अज्ञात असतें; तथापि त्याच्या अंतरंगांत जी पूर्ण जाणीव उपस्थित असते, ती सर्व कांहीं स्वतःचे ठिकाणी संभाळून असते; तो जें कांहीं विसरतो, तें सर्व त्या आंतर जाणिवेंत ''जिवंत'' असतें; परिणामकारक अवस्थेंत हजर असतें.

      पृष्ठगत जाणिवेचें अनन्य केन्द्रीकरण व्यवहारतः सामान्य बाबतींतहिं कसें उपयोगी असतें आणि त्याचें स्वरूप व फळ काय असतें, तें अल्पकालीन केन्द्रीकरणाचीं उदाहरणें पाहिलीं असतांहि समजून येईल. बाह्य मनुष्य क्षणवर्ती जीवन जगत असतां प्रस्तुत जीवनांत अनेक भूमिका घेत असतो; यांपैकीं कोणतीहि एक भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेवर तो आपलें सर्व बळ, चित्त केन्द्रित करूं शकतो; या केन्द्रीकरणांत तो आपली त्या भूमिकेखेरीज बाकी भूमिका करण्याची पात्रता निखालस बाजूला ठेवतो, विसरतो; या विस्मृतीच्या प्रमाणांत त्याला आत्मविस्मृति होत असते. क्षणापुरता तो नट होतो, कवि होतो, सैनिक होतो, त्याच्या अस्तित्वशक्तींतील वैशिष्टयानें त्याला काय बनविलें असेल तें होतो; आणि या भूमिकेंतील त्याचें यश जाणिवेच्या केन्द्रीकरणावरच अवलंबून असतें; त्या भूमिकेवर जितक्या प्रमाणांत तो आपलें बाकीचें शक्तिसर्वस्व विसरेल, तितक्या प्रमाणांत त्याची भूमिका यशस्वी होत असतें; पण वस्तुस्थिति काय असते ? मनुष्याचा कोणताहि एकच अंश कोणतीहि भूमिका घेत नाहीं किंवा वठवीत नाहीं. सगळा मनुष्य प्रत्येक भूमिका घेतो व वठवितो; मनुष्य जें काम करतो तें काम, तें काम करण्याचा त्याचा मार्ग, तें काम करण्यांत जे गुण त्यानें प्रकट केलेले असतात ते गुण, त्या

पान क्र. ५१२

 

कामाला जे खास रूप तो देतो तें रूप, हें सर्व कशावर अवलंबून असतें ? त्याचें एकंदर शील आणि स्वभाव, त्याचें मन, त्याची माहिती, त्याची प्रतिभा या सर्व गोष्टींवर तो कोणतें काम अंगावर घेईल, तें कशाप्रकारें करील वगैरे सर्व अवलंबून असतें; आणि हें त्याचें शील व स्वभाव, त्याचें मन वगैरे कोठून येतें ? अर्थात् त्याच्या भूतकालीन जीवनांतून; या जन्मांतीलच केवळ नव्हे, तर अन्य जन्मांतीलहि त्याच्या भूतकालीन जीवनांतून. आतां, आणखीहि थोडें पुढे गेलें पाहिजे. ज्याप्रमाणें त्याचें भूतकालीन जीवन त्याचा स्वभाव वगैरे बनवीत असतें, त्याप्रमाणें तो स्वभाव वगैरे घडण्यांत त्याचें वर्तमानकालीन जीवन आणि त्याचें नियत भविष्यकालीन जीवनहि भाग घेत असतें; एवढेंच नव्हे, तर सर्व जगाचें भूतकालीन, वर्तमानकालीन आणि नियत भविष्यकालीन जीवन देखील त्याचा स्वभाव वगैरे घडण्यांत भाग घेत असतें, त्याचें काम कोणतें तें ठरवीत असतें, तें तो कसें करील वगैरे सर्व ठरवीत असतें. नट, कवि, सैनिक हा जो विशिष्ट प्रसंगीं एकाद्या मनुष्यांतून बाहेर प्रकट होतो, तो त्याच्या तपाचें, जाणिवेच्या अनन्य व भेदनिष्ठ एकाग्रतेचें, केन्द्रीकरणाचें फळ म्हणून प्रकट होतो; त्याच्या अस्तित्वाची शक्ति विशिष्ट क्रियेकरितां संघटित केली गेली आहे, असा त्याच्या प्रासंगिक नट वगैरे भूमिकांचा अर्थ असतो -- हें भेदनिष्ठ शक्तिसंघटन, आणि विशिष्ट भूमिका करतांना स्वत:ला विसरून जाणें हा कांहीं जाणिवेचा दुबळेपणा, दोष नसतो, ती जाणिवेची एक थोर शक्ति असते; नट वगैरे भूमिका करतांना मनुष्य त्या विशिष्ट भूमिकेशीं सर्वथा समरस होऊन आपलें बाकीचें सर्व अस्तित्व विसरत असला, तरी तें अस्तित्व सर्व काळ प्रकट भूमिकेच्या मागें सर्वच्या सर्व उपस्थित असतें; चालूं भूमिकेंतहि तें असतें आणि भूमिका वठविण्याच्या कामांत भाग घेत असतें. विशिष्ट भूमिका करतांना स्वत:ला विसरणें आणि बाह्य मनुष्यानें बाह्य व्यापारांत मग्न होऊन आंतर मनुष्याला विसरणें, या दोन गोष्टींत एवढाच फरक आहे कीं, भूमिकेच्या बाबतींत भेदाची भिंत पातळ असून फार काळ टिकणारी नसते; भूमिकेच्या बाबतींत मनाला आपलें केन्द्रीकरण केव्हांहि थांबवितां येतें, दूर करतां येतें आणि आपली विशाल जाणीव केव्हांहि चटकन् परत आपलीशी करतां येते; पण बाह्य व्यापारांत मग्न झालेला मनुष्य, त्याच्या आंत असलेल्या त्याच्या खऱ्या स्वरूपाला आपल्या इच्छेनुसार केव्हांहि चटकन् आपलें करूं शकत नाहीं; हा दोहोंत फरक आहे. पृष्ठगत, दर्शनी, बाह्य मनुष्याला

पान क्र. ५१३

 

विशिष्ट बाधा झाली किंवा त्याच्या अतिमानसिक पातळींतून त्याच्या मनावर कांहीं असामान्य संस्कार झाला, अर्थात् त्याचें मन कोणत्याहि कारणानें अपवादात्मक स्थितींत गेलें किंवा त्यानें दीर्घकाळपर्यंत कठोर साधना केली, आत्म्याची खोली, उंची, व्यापकता वाढावी, खूप मोठी व्हावी ह्यासाठीं त्यानें कठोर प्रदीर्घ साधना केली, तर या साधनेचें फळ म्हणून त्याला आपलें खरें स्वरूप आपलेंसें करतां येतें. अर्थांतच साधनेचें फळ दीर्घकाळ टिकणारें, कमीअधिक कायमचें टिकणारें आणि अपवादात्मक स्थितींतल्यापेक्षां पुष्कळ अधिक पूर्ण असतें हें सांगावयास नको. अपवादात्मक मानसिक स्थितींतला, स्व-स्वरूप-प्रवेश अल्पकाळ टिकणारा आणि अंशमात्र असतो. तें कांहीं असलें, तरी महत्त्वाची गोष्ट ही कीं, बाह्य मनुष्य आंत जाऊन आपलें खरें स्वरूप प्राप्त करून घेऊं शकतो : नटादि भूमिका काय, किंवा बाह्य पुरुषाची ''भूमिका'' काय, दोन्हीं ठिकाणीं अनन्य एकाग्रता किंवा केन्द्रीकरण हेंच त्या भूमिकांच्या मुळाशीं असतें.

      आपल्या महान् आत्म्याचा एक विशिष्ट व्यवहार घेऊन त्या व्यवहारावर एकाग्रतेनें आपली सर्वशक्ति केन्द्रित करणें, ही क्रिया पूर्ण आत्मविस्मृतीच्या दशेपर्यंत नेतां येते. नट हा राम, रावण इत्यादि भूमिका करतांना स्वत:ला सर्वथा विसरूं शकतो. राम रावणादिकांचा स्वभाव, त्यांची विशिष्ट करणी यांच्याशीं तो पूर्ण तादात्म्य पावूं शकतो : कवि स्वत:ला सर्वथा विसरून, त्याचे ठिकाणीं काम करणाऱ्या संस्फूर्त निर्व्यक्तिक प्रतिभाशक्तीशीं एकरूप होऊन, अंतरांतील शब्द, नाद, ताल यांना साकार करण्यांत तन्मय होऊं शकतो; सैनिक स्वत:ला सर्वथा विसरून रणधुमाळींतील चढाई, लढाई, कापाकापी, गोळागोळी या क्रियांशीं, चौफेर हत्या करण्याच्या आपल्या कर्तव्याशीं पूर्ण तादात्म्य पावूं शकतो. भूमिकांची ही कथा झाली. अनैच्छिक विकारांची गोष्ट अशीच आहे -- अतिशय क्रोधाच्या कह्यांत गेलेला मनुष्य स्वत:ला सर्वथा विसरतो, तो क्रोधरूप होतो; क्रोधरूप झाला असतां तो स्वत:च्या दुसऱ्या अनेक विकारांना, विकारनियंत्रणाच्या स्वत:च्या शक्तीला, स्वत:ला मार्गदर्शन करण्याऱ्या स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या इतर सर्व अस्तित्वाला सर्वथा पारखा होतो. पण हें सर्व विसरणें तात्पुरतें असतें : नट, कवि, सैनिक, तसाच क्रोधादि विकारमय झालेला मनुष्य आपल्या भूमिकेतून, विकारांतून कमीअधिक वेळानें बाहेर येतोच येतो : साधारण मनाचा व्यापार, त्याची

पान क्र. ५१४

 

आत्मविस्मृति, ही अवस्था कितीहि पूर्ण असली तरी ती, फार वेळ टिकूं देत नाहीं; भूमिकेच्या किंवा विकाराच्या कोंडींतून आत्मविस्मृत मनुष्याला बाहेर काढून त्याची विशाल जाणीव त्याला परत भेटविण्याचें काम मानवी मन स्वभावत: करीत असतें; या कामाला केव्हां कमी वेळ लागतो, तर केव्हां अधिक वेळ लागतो, इतकेंच.

      मनुष्याच्या मर्यादित जाणिवेंत अनन्य एकाग्रतेनें जी आत्मविस्मृति घडून येते ती अल्पकालीन असते व असणार; परंतु अमर्याद, विशाल, विश्वव्यापी जाणिवेची गोष्ट वेगळी आहे. तिच्या ठिकाणीं एकाग्रतेची व तन्निमित्त होणाऱ्या आत्मविस्मृतीची स्थिति पराकोटीला नेण्याची शक्ति सहाजिकच असते; ही पराकोटीची आत्मविस्मृति मानवी नेणिवेंत होऊं शकत नाहीं. मानवी नेणीव टिकाऊ नसते; जागृत जाणीवयुक्त अस्तित्व, मानवी नेणीवयुक्त अस्तित्वाच्या मागून लवकरच हजर होतें; मनुष्य हा स्वभावत: आणि सामान्यत: जागृतीच्या जाणिवेचा उपयोग करणारा असतो आणि ही स्वाभाविक जागृति त्याला त्याच्या नेणिवेच्या अवस्थेंतून लवकरच बाहेर काढीत असते. पराकोटीची एकाग्रतानिमित आत्मविस्मृति भौतिक निसर्गाच्या अचेतनतेंत प्रत्ययास येते. ही अचेतनता खरी अचेतनता नसते; आमच्या अल्पकालीन अस्तित्वांत, आमच्या जागृत जाणिवेवर, अनन्य एकाग्रतेनें जें अज्ञानाचें आवरण पडतें, त्या आवरणासारखेंच या अचेतनतेचें आवरण असतें. परमाणु, धातु, वनस्पति, भौतिक निसर्गांतील कोणताहि साकार पदार्थ, भौतिक निसर्गांतील कोणतीहि शक्ति यांच्या पोटीं, आमच्या अंतरंगांत असतो तसा, गूढ आत्मा असतो, गूढ इच्छाशक्ति असते, गूढ बुद्धि असते. आमचा किंवा परमाणु धातु आदिकांचा मूळ आकार, आत्मविस्मृतींत मग्न असा दिसला आणि असला, तरी त्या आमच्या वा परमाणु आदिकांच्या आकाराच्या पोटीं, अंतरंगांत लपलेला गुप्त आत्मा, इच्छाशक्ति, बुद्धि काम करीत असते; उपनिषदांत, सर्व वस्तूंच्या पोटीं, नेणीवयुक्त वस्तूंच्या पोटींहि, चेतन पुरुष अर्थात् इच्छा-बुद्धियुक्त आत्मा असतो, असें म्हटलें आहे; हा पुरुष सर्वत्र गुप्त राहून काम करीत नसता, त्याची जाणीवशक्ति वस्तूंचें अंतरंग व्यापून तप (एकाग्रतायुक्त कार्य) करीत नसती, तर निसर्गांतील कोणतेंहि कार्य घडून आलें नसतें; घडून येणें अशक्य होतें. निसर्गांत अचेतन, नेणीवयुक्त अशी वस्तु म्हणजे प्रकृति असते; प्रकृतीची शक्ति आकारबांधणीचें, गतीचें कार्य करीत असते. ती अचेतन असते, ती आपल्या

पान क्र. ५१५

 

कार्याशीं एकरूप झालेली असते, एकाग्रतेच्या समाधींत किंवा तंद्रींत असते. प्रकृति आकारांत बंद आहे तोपर्यंत तिचा खरा आत्मा जो पुरुष (पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व आणि या अस्तित्वाची पूर्ण शक्ति) तो आत्मा, या प्रकृतीला दूर असतो, हा आत्मा तिनें मागें ठेवलेला असतो, तंद्रींत असतांना तिला त्याजकडे परत जातां येत नाहीं; कार्याच्या आनंदमय समाधींत आत्म्याला ती पार विसरून जाते. प्रकृति ही पुरुषाची कार्यकारी शक्ति; ती आपल्या अंतरंगांत पुरुषाला धरून असते. पण बाह्यतः आकाराचे ठिकाणीं ती या पुरुषाला पार विसरून असते; अचेतन होऊन बसते; अचेतनाच्या तंद्रींतून जाणीव जसजशी वर येऊं लागते तसतशी क्रमश: प्रकृतीला पुरुषाची जाणीव होऊं लागते. प्रकृति पुरुषासाठीं आकार बनविते, हे आकार पुरुष स्वखुषीनें मान्य करून धारण करीत असतो. प्रकृतीच्या तंत्रानें वागून पुरुष अचेतनाचा आकार, स्थूल भौतिक अस्तित्वाचा आकार, प्राणमय अस्तित्वाचा आकार, मनोमय अस्तित्वाचा आकार धारण करीत असतो. पण ही त्याची दर्शनीं रूपें असतात; या सर्व रूपांत वावरतांना पुरुष वस्तुत: आपलें खरें पूर्ण प्रकाशमय स्वरूप बाळगून असतो; अचेतन स्वरूपांतील प्रकृतीचें कार्य असो, किंवा क्रमश: वाढती जाणीव असलेल्या रूपांतील प्रकृतीचें कार्य असो, प्रकृतीच्या पोटांत गुप्त असलेल्या पूर्ण जाणिवेच्या पुरुषाचा या कार्याला आधार असतो; त्याच्या प्रकाशानें सर्व रूपांतील सर्व कार्य चाललेलें असतें.

      भौतिक निसर्गाची अचेतनता वरकरणी असते; जागृत मानवी मन कोणत्याहि विषयावर एकाग्र झालें असतां, त्याला वरकरणी इतर-विषयक अज्ञान व्यापतें, किंवा मनुष्याच्या झोंपलेल्या मनाला वरकरणी अचेतनता किंवा अवचेतनता व्यापते, पण आंत सर्वज्ञ पुरुष असतो; तद्‌वत् निसर्गांतील अचेतनता असते. तिच्या पोटीं सर्वज्ञ पुरुष असतो; अचेतनता ही सर्वथा दर्शनी रूपात्मक वस्तु असते; मात्र ती पूर्ण असते, अचेतनतेचा देखावा तेथें निर्दोष असतो. हा देखावा इतका पूर्ण आणि निर्दोष असतो कीं, अचेतन अशा जड भौतिकांत प्रकृतीला तिचा आत्मा (पुरुष) केव्हांहि भेटूं शकत नाहीं. विकासशील जाणीव अचेतनांतून दुसरे आकार तयार करते, या आकारांत अचेतनतेची क्रियापद्धति सैल केली जाते, तेव्हां मग प्रकृति या आकारांच्या द्वारां पुरुषाला हळूं हळूं अधिकाधिक प्रमाणांत ओळखूं लागते : अर्थात् तिची क्रियापद्धति अधिकाधिक जाणीवयुक्त होऊं लागते. जाणीव आणि शक्ति पूर्णतया अलग झाल्यानें

पान क्र. ५१६

 

अचेतनता निर्माण होते. शक्ति मूलत: जाणीवयुक्तच असते, पण कार्याचे ठिकाणीं तिच्या एकाग्र केन्द्रिततेची परमावधि झाली, म्हणजे ती जाणिवेपासून विभक्त होते. आंत जाणीव, बाहेर शक्ति किंवा शक्तिकार्यरूप आकार, अशी व्यवस्था होते. या पूर्ण अचेतनतेंतून मग चेतनतेचा क्रमश: विकास होऊं लागतो. आंतली जाणीव (म्हणजे पुरुष) आपल्या इच्छेनें अचेतनाच्या पायावर सचेतन आकारांची उभारणी करतो. प्रकृति म्हणजे पुरुषाची शक्ति. ही प्रकृति अचेतनांतून जाणिवेला, म्हणजे पुरुषाला पूर्णपणें पारखी होते, विसरते. पुढें विकासशील जाणिवेच्या, म्हणजे पुरुषाच्या प्रेरणेनें अचेतनाच्या पायावर सचेतन आकारांची बांधणी सुरू झाली कीं प्रकृति क्रमश: अधिकाधिक जाणीवयुक्त होत जाते. मनुष्येतर प्राण्यांचे ठिकाणीं ती थोडीशी जाणीवयुक्त होते, मनुष्य चांगला प्रगत झाला म्हणजे त्याचे ठिकाणीं पृष्ठगत विभागांत खरें जाणीवयुक्त कार्य ती करूं लागते. मुख्य लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही कीं, जाणिवेच्या बाह्य एकाग्रतेनें अज्ञानांकित झालेला पृष्ठगत मनुष्य आणि खरा आंतर मनुष्य हे जसे अविभक्त असतात, पण विभक्त दिसतात, तशीच गोष्ट अचेतन प्रकृति आणि पुरुष (जाणीव) यांची असते : तत्त्वत: विश्वाच्या व्यवस्थेंत भौतिक निसर्गाची अचेतनता ही जाणिवेच्या एकाग्रतेचें, अनन्य एकाग्रतेचेंच एक रूप आहे; जागृत मन एकाग्रतेनें एखाद्या कार्यांत मग्न होऊन जसें स्वतःला मर्यादित करतें, तशीच गोष्ट अचेतनतेच्या बाबतींत घडत असते; एवढेंच कीं स्वतःला मर्यादा घालण्याचें कार्य अचेतनतेच्या बाबतींत जाणिवेनें पराकोटीला नेलेलें असतें; या पराकोटीच्या मर्यादित जाणिवेच्या अवस्थेंत आत्मविस्मृति देखील पराकोटीला जाते; ती मग तात्कालिक किंवा अल्पकालीन राहत नाहीं, तर निसर्गाच्या क्रियेचा नियम बनते. अर्थात् नेणीव किंवा अचेतनता ही भौतिक निसर्गांत जाणिवेच्या ठिकाणीं पूर्ण आत्मविस्मृति, आत्मज्ञानाचा पूर्ण अभाव या स्वरूपाची असते. मनुष्यांत थोडेसें ज्ञान व पुष्कळसें अज्ञान असतें तें जाणिवेचें आत्मविषयक अज्ञान कमी झाल्याचें द्योतक असतें; विकासक्रमांत जाणीव पूर्ण आत्मज्ञानाकडे वाटचाल करीत असते, या वाटचालींत मनुष्याचें अज्ञानयुक्त अल्प आत्मज्ञान हा एक टप्पा असतो; पण भौतिक निसर्गाचें पूर्ण अज्ञान मनुष्याचें अपूर्ण अज्ञान या दोन्हीचें कारण तपासतां, जाणीवयुक्त शक्तीची आत्मविस्मृतियुक्त अनन्य एकाग्रता हेंच तें कारण दिसतें; ही एकाग्रता पृष्ठगत असते आणि एका विशिष्ट व्यापारावर किंवा व्यापारकक्षेवर

पान क्र. ५१७

 

जाणीव एकाग्र झालेली असते : अर्थात् हा व्यापार किंवा ही व्यापारकक्षा हीच फक्त जाणिवेला दिसत असते; या व्यापाराशीं किंवा व्यापारकक्षेशीं जाणीव तद्रूप झालेली असते; ज्या व्यापारांत जाणीव केन्द्रित झाली असेल, त्या व्यापारापुरतें तिचें अज्ञान (इतर विषयक अज्ञान) परिणामकारक असतें; पण हें अज्ञान दर्शनी असतें, एकांगी असतें, पृष्ठगत असतें; तें कांहीं मौलिक असत नाहीं, पूर्ण असत नाहीं, खरें असत नाहीं. खरें असत नाहीं याचा अर्थ, पूर्णतया खरें असत नाहीं, असा घ्यावयाचा आहे; आमच्या अस्तित्वाचें पूर्ण सत्य या दर्शनी सत्यानें व्यक्त होत नाहीं, (विशिष्ट व्यापारापुरतें तें सत्यच असतें, हें वर सांगितलेंच आहे) -- एवढेंच नव्हे, तर या अज्ञानाकडे पाहतांना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलें, तर या अज्ञानांतील सत्यांश देखील आमच्या जाणिवेला विकृत स्वरूपांत दिसतो. अज्ञानाचें पूर्णतया खरें सत्यस्वरूप हें आहे कीं, जाणिवेनें व ज्ञानानें स्वतःला पडद्याआड लपविलें, म्हणजे जाणिवेला व ज्ञानाला नेणिवेचें (अचेतनतेचें) स्वरूप येतें. ही नेणीव, हें अज्ञान जाणिवेच्या अनन्य एकाग्रतेचें फळ असतें हें वर आलेंच आहे. पडदे बनवून स्वतःला पूर्णपणें लपविण्याची क्रिया संपतांच उलट क्रिया, पडदे दूर करून, फाडून व्यक्त होण्याची, विकासाची क्रिया सुरूं होते. पडदे बंद झालेली जाणीव व ज्ञान, विकासमार्गाला लागून पुन: आपलें मूळ पूर्ण स्वरूप परत मिळविण्याच्या मार्गाला लागतात. या विकासमार्गावरच्या, आपले पडदे दूर करूं लागलेल्या पडदेबंद जाणिवेला व ज्ञानाला आम्ही अज्ञान हें नांव देतों. हें अज्ञानाचें पूर्णतया खरें सत्यस्वरूप आहे. पडदा पांघरून जाणिवेची ही नेणीव (अचेतनता) आणि जें अज्ञान बनतें तें अज्ञान आणि ती नेणीव त्या त्या व्यवहारांत कार्यक्षम असते, हें आपण पाहिलेंच आहे.

      अज्ञानाचा मूळ स्वभाव आतां आपल्याला समजला आहे : जाणीवयुक्त शक्ति आपल्या कार्यांत मग्न होते, व आपला पूर्ण आणि खरा आत्मा विसरते, बाह्यतः विसरते; ही शक्ति मर्यादा घालणारी भेदनिष्ठ शक्ति असते; ही शक्ति कांहीं खरोखरीच भेद उत्पन्न करीत नाहीं, खरोखरीची विभागणी करीत नाहीं, केवळ दर्शनी विभागणी करते; अशी दर्शनी विभागणी व्यवहारासाठीं करणारी आणि कार्यांत मग्न होऊन आपला आत्मा, खरें स्वरूप बाह्यतः विसरणारी जाणीवयुक्त शक्ति म्हणजे अज्ञान होय. ही अज्ञानाची क्रिया कां व कोठें उद्‌भवते आणि ती कशी शक्य होते

पान क्र. ५१८

 

या प्रश्नाचा विचार आतां करावयाचा आहे. विश्वांत अज्ञान कशासाठीं व कां आहे ? त्याची आवश्यकता काय ? या प्रश्नाचें उत्तर : ब्रह्माच्या नामरूपात्मक आविष्कारासाठीं, विशिष्ट प्रकारच्या आविष्कारासाठीं आणि पूर्ण आविष्कारासाठीं, त्याचा आविष्कार जसा घडावा आणि घडला आहे तसा तो घडण्यासाठी अज्ञानाची आवश्यकता होती व आहे. अज्ञान नाना प्रकारचें आहे, अज्ञानाचा प्रत्येक प्रकार आवश्यक म्हणूनच अस्तित्वांत आला आहे; अज्ञान नसतें, तर मनुष्य आपल्या कालातीत अस्तित्वांत रमला असता. हें आपलें कालातीत अस्तित्व बाजूला राखून, ठेवून तो कालाच्या प्रवाहांत स्वखुशीने पडला आहे, ही गोष्ट अज्ञानामुळें शक्य झाली आहे. या कालप्रवाहांतील मनुष्याचें जीवन कालातीत जीवनाहून वेगळें आहे -- तें जीवन अक्षर, अपरिवर्ती आणि हें जीवन क्षणाक्षणाला परिवर्तन पावणारें, क्षर; -- अज्ञानामुळेंच मनुष्याला हें जीवन शक्य होतें. अज्ञान नसतें, तर कालातीत मनुष्य कालांकित, क्षणांकित जीवनांत उतरला नसता, उतरूं शकला नसता. जर अज्ञान नसतें, तर अतिचेतन किंवा आंतर चेतन आत्म्याच्या रूपानें त्याच्या क्षेत्रांत राहणारा मनुष्य तेथेंच राहिला असता. अज्ञानाची शक्ति नसती, तर आज त्याला जी मानसिक व्यक्तिता आहे आणि जिच्यामुळें जगाशीं नाना प्रकारचे गुंतागुंतीचे सबंध जोडणें, तोडणें त्याला भाग पडत आहे, ती व्यक्तिता व तिच्या प्रेरणेनें करावा लागणारा खटाटोप अतिचेतनाचे, आंतर चेतनेचें क्षेत्र सोडून त्यानें पत्करला नसता. अज्ञानाची शक्ति नसती, तर विश्वात्म्यांतील आपली बैठक मनुष्यानें सोडली नसती, त्याला ''मी'' ची भेदनिष्ठ जाणीव लाभली नसती, आणि ''मी'' च्या अभावी विश्वाच्या कार्यक्रमांत ''मी''नें जी भर घातली आहे ती त्याजकडून घातली गेली नसती; ''मी'' आहे म्हणून मनुष्य भेदनिष्ठ कार्य करतो, स्वत:ची स्वतंत्र व्यक्तिता दाखवितो, स्वतःला पुरुष किंवा एकच एक कार्यकेन्द्र मानून सर्व निरीक्षण आणि व्यवहार करतो. मनुष्याला कालविषयक अज्ञान, मनोविषयक अज्ञान आणि अहम् विषयक अज्ञान पांघरावें लागतें एवढ्याकरितां कीं, अनंताचा प्रकाश, विश्वात्म्याची विशालता यांची ''बाधा'' त्याला न व्हावी : ही बाधा टाळणारा अज्ञानाचा संरक्षक पडदा उभा करून तो विश्वामध्यें आपली कालांकित व्यक्तिता उभी करतो आणि संवर्धित करतो. त्याला भूतकालविषयक आणि भविष्यकालविषयक, स्वतःच्या अनंत भूतकालाचे आणि भविष्यकालाचें अज्ञान पांघरावें लागतें; एकच प्रस्तुत जन्म त्याला आहे,

पान क्र. ५१९

 

अशा प्रतीतीनें त्याला वागावें लागतें. हें अज्ञान नसेल, तर त्याला आपल्या परिसराशीं जे विशिष्ट संबंध उभे करून निभवावयाचे असतात, ते त्याला उभे करतां आले नसते, त्याचें ज्ञान, विशाल ज्ञान त्याच्या विशिष्ट भूमिकेच्या आड आलें असतें; त्याच्या कार्याचें धोरण, प्रमाण व त्याचें रूप आज जें आहे तें अज्ञानाच्या अभावीं शक्य झालें नसतें. तो मनांत वास करतो, आपलें शारीर जीवन चालविण्यांत मग्न होऊन तो मनांत आपली बैठक ठेवतो, तो अतिमानसिक क्षेत्रांत राहत नाहीं; असें तो न करता, तर अज्ञानाच्या भिंती आज ज्या त्याला ''संरक्षण'' देऊन त्याजकडून विशिष्ट कार्य करवून घेतात, त्या भिंती उभ्या करतां आल्या नसत्या किंवा त्या फार पातळ व पारदर्शक होऊन त्याचें विशिष्ट कार्य त्याजकडून घडण्याच्या आड आल्या असत्या. आज ज्या भिंती आहेत त्या मनाच्या, मर्यादा घालणाऱ्या, भेद करणाऱ्या, विभागणी करणाऱ्या शक्तीमुळें उभ्या झाल्या आहेत.

      अज्ञान, अर्थात् जाणिवेची अनन्य एकाग्रता ही कोणत्या हेतूनें अस्तित्वांत आली आहे ? कशाकरितां या अज्ञानाची आवश्यकता आहे ? गुप्त चैतन्य, प्रकृतीच्या क्षेत्रांत अज्ञान पांघरतें तें अशाकरितां कीं, एक विशिष्ट आनंद त्याला भोगतां यावा : पूर्णरूप स्वतःला विसरत विसरत पूर्णपणें स्वतःला विसरणें व नंतर स्वतःला, विस्मृतीच्या अनेक पडद्याआड दडलेल्या स्वतःला, शोधीत शोधीत स्वतःचा पूर्ण शोध लावून आपलें पूर्णरूप पुन: आपलें करणें, हा चक्री कार्यक्रम चैतन्याला विशिष्ट आनंद देणारा आहे आणि या आनंदासाठीं अज्ञानाचा (जाणिवेच्या अनन्य एकाग्रतेचा) उपयोग करून चैतन्याला हा चक्री कार्यक्रम आंखून तो पार पाडावा लागतो. विश्वाचा आविष्कार अज्ञानाच्या अभावीं मुळींच होणार नाहीं, होऊं शकणार नाहीं, अशी गोष्ट नाहीं; परंतु अज्ञानाच्या अभावी जें विश्व उभें केलें जाईल तें, आजच्या आपल्या विश्वाहून वेगळें असेल; अज्ञानाच्या अभावीं, ईश्वराच्या अस्तित्वाच्या ज्या उच्च भूमी आहेत त्या उच्चभूमींपुरती उच्च विश्वरचना होईल; जेथें विकासाचा कार्यक्रम नाहीं, अशा प्रकारचें विश्वहि अज्ञानाच्या अभावीं निर्माण होऊं शकेल; या विश्वांत प्रत्येक जीव आपल्या स्वभावांतील सर्व प्रकाश वापरून जीवन जगेल; अविकासी, म्हणजेच आपापल्या परी पूर्ण, अशा जीवांचें हें जग असेल; आमच्यासारखें विकासी जीवांचें जग असणार नाहीं. या आमच्या जगांत ज्याला आम्हीं आमचे साध्य समजतो व ज्याच्याकरितां विकासक्रमाच्या पायऱ्या चढूं इच्छितो,

पान क्र. ५२०

 

तो जीवनक्रम त्या जगांत नित्यसिद्ध जीवनक्रम असणार; या आमच्या जगांत ज्या अस्तित्वाला विकासक्रमांतील एक पायरी म्हणून आम्हीं महत्त्व देतो तें अस्तित्व, त्या जगांत कायमचें सांचेबंद अस्तित्व असणार. असो. सच्चिदानंद ईश्वर (चैतन्य, परमात्मा, पुरुषोत्तम) खालीं उतरून भौतिक अचेतनतेंत शिरला आहे; तेथील पूर्ण अज्ञान म्हणजे नेणीव, त्यानें सोंगाचें बाह्य आवरण म्हणून स्वीकारलें आहे, या आवरणांत तो स्वतःला स्वत:च्या जाणीवयुक्त शक्तीपासून लपवितो. ती शक्ति, स्वतःच्या आत्म्याला विसरून, आपलीं नियोजित कार्यें करण्यांत, रूपें घडण्यांत मग्न असते; तिला तशी मग्न ठेवून भौतिक अचेतनेच्या नेणिवेच्या पडद्याआड सच्चिदानंद लपून बसतो. हा सर्व व्यवहार सच्चिदानंद एवढ्याकरितां करतो कीं, स्वतःचें अस्तित्व आणि स्वतःचा स्वभाव यांच्या उलट जी स्थिति आहे, अर्थात् जेथें नित्यता नाहीं, चेतना नाहीं, आनंद नाहीं, अशा स्थितींत आपलें सच्चिदानंदत्व प्रस्थापित करावयाचें ही आपली लहर कार्यान्वित करतां यावी. त्याची जाणीवशक्ति जीं रूपें तयार करते, त्या रूपांत आत्मा हळूंहळूं जागा होऊं लागतो, तेथें या क्रमश: जाग्या होणाऱ्या आत्म्याला आपली अनिवार्य अवस्था म्हणून बाह्यतः अज्ञान पत्करावें लागतें. या रूपांत आरंभाला पूर्ण अचेतनता राज्य करीत असते; या अचेतनतेंतून ज्ञान हळूंहळूं क्रमाक्रमानें जागृत होऊन आत्म्याला सहकार्य देतें. या क्रमश: वाढणाऱ्या ज्ञानालाच आम्हीं अज्ञान म्हणतो : सच्चिदानंदाला विसरून त्याच्या शक्तीनें जें अचेतनाचें क्षेत्र निर्माण केलेलें असतें, त्या नव्या क्षेत्रांत, क्रमश: वाढणाऱ्या ज्ञानाच्या सहकारानें आत्म्याला आपलें मूळ स्वरूप (सच्चिदानंदत्व) पुन: शोधून काढून ओळखावयाचें असतें, आणि त्या स्वरूपाच्या प्रकाशांत आपलें जीवन बदलून दिव्य करावयाचें असतें; अचेतनाच्या क्षेत्रांत ईश्वर ज्या हेतूनें उतरला तो हेतु, आत्मा त्या क्षेत्रांत जागा होऊन याप्रमाणें पूर्ण करीत असतो. त्याचें जीवन हळूंहळूं परिस्थितीशीं झगडत तो हेतु पूर्ण करण्यासाठीं श्रमत असतें. विश्वचक्राचा हेतु, पूर्ण प्रकाश आणि आनंद जेथें नित्याचा असतो, अशा स्वर्गांत शक्य तितक्या लवकर आत्म्याने परत जावें, हा नाहीं; किंवा विश्वातीत अवस्थेचा आनंद शक्य तितक्या लवकर आत्म्यानें परत मिळवावा असा नाहीं; लांबलचक असमाधानकारक अशा अज्ञानाच्या चाकोरींतून जीवनाचा गाडा आत्म्यानें फिरवीत रहावें, ज्ञानासाठीं त्यानें धडपड करीत असावें आणि तें त्याला केव्हांहि मिळूं नये, पूर्णतेनें केव्हांहि मिळूं नये, अर्थात्

पान क्र. ५२१

 

आत्म्यानें जीवनाचा गाडा बिनाहेतु फिरवीत रहावें, निष्फळ फेरे घालीत रहावें, कसलीहि सिद्धि न अपेक्षितां पुन: पुन्हां चक्कर मारीत रहावें, असाहि विश्व चक्राचा हेतु नाहीं. विश्वाच्या चक्राकार भ्रमन्तीला कांहीं हेतूच नसला, तर सर्वज्ञ ईश्वरानें अज्ञान (जाणिवेची एकाग्रता) उभें करण्यांत घोडचूक केली आहे, अगम्य प्रमाद केला आहे असें म्हणावें लागेल, किंवा त्याचा हा प्रमाद नसेल, तर त्याला हें दुःखमय निष्फळ अज्ञान अटळ निकडीमुळें अस्तित्वांत आणावें लागलें आहे, असें म्हणावें लागेल; पण ही निकड अटळ कशी, ही गोष्ट अगम्यच राहील. पण ईश्वराला अशी निकडच पडत नाहीं आणि तो प्रमादहि करीत नाहीं; त्याच्या विश्वाच्या भ्रमन्तीला हेतु आहे, आणि तो हा आहे कीं, विश्वगत अस्तित्वांत विश्वातीत अस्तित्वांतील आत्मानंद आत्म्यानें प्राप्त करून घ्यावा. शरीरयुक्त भौतिक अस्तित्वांत मूळ चैतन्याच्या परिस्थितीच्या विरोधी परिस्थिति अनेक प्रकारची असते; या विरोधी परिस्थितींत आत्म्यानें त्याचा प्रकाशपूर्ण आनंदाचा स्वर्ग निर्माण करावा, हा या विश्वभ्रमन्तीचा हेतु आहे; अर्थात् आपलें मूळ स्वरूप आत्म्यानें प्राप्त करून घेतल्याशिवाय हा स्वर्गाचा आनंद किंवा आत्मानंद मिळणार नसल्यानें, विश्वगत आत्म्यानें आत्मस्वरूप शोधून काढण्याचा नवा आनंद भोगीत मार्गक्रमण करावें, या मार्गक्रमणांत आनंदार्थ धडपडीचा आनंद भोगावा, असा मानवी शरीरांत आत्म्याला जन्म मिळण्याचा खरा हेतु आहे; मानववंश विश्वाच्या भ्रमन्तीबरोबर जे फेऱ्यावर फेरे मारीत राहिला आहे, त्या फेऱ्यांचाहि हेतु मानववंशाला या विश्वगत अस्तित्वांत आत्मानंद, स्वर्गानंद प्राप्त करतां यावा हाच आहे. अज्ञान पांघरूनच विश्वव्यापी ज्ञान, ईश्वरी ज्ञान हा कार्यक्रम करूं शकतें; म्हणून अज्ञान अनिवार्यपणेंच अस्तित्वांत येतें; अर्थात् अज्ञान हा प्रमाद नव्हे, अधःपात नव्हे, तर ईश्वरानें खाली उतरून बुद्धिपुरःसर निर्माण केलेली अवस्था आहे; अज्ञान हा शाप नाहीं, तर दिव्य गोष्टीच्या प्राप्तीकरितां आत्म्याला दिलेलें दिव्य साधन, दिव्य संधि असें अज्ञानाचें स्वरूप आहे. आत्मा, आत्मचैतन्य भौतिक विश्वांत जन्म घेतें -- या चैतन्याला जें कार्य करावयाचें आहे, तें ईश्वराला भौतिक जडद्रव्याचें मंदिर करून देणें हें आहे; अन्यत्र शक्य नसून जें भौतिक परिसरांतच शक्य आहे, तें अनंत ईश्वरी अस्तित्वाचें ईश्वरी जीवन भौतिक परिसरांत वास्तवांत आणणें, हें कार्य भौतिकांत जन्म घेणाऱ्या चैतन्याला करणें आहे. ब्रह्माण्डाची सूक्ष्म आवृत्ति जो

पान क्र. ५२२

 

भौतिक मानवी पिंड, त्या मानवी पिंडांत जन्म घेऊन, तेथें सर्वात्म्याच्या सर्व भोगांचा सर्वानंद, विदेही विश्वात्म्याचा विश्वानंद, सदेह करणें हें कार्य भौतिकांत जन्म घेणाऱ्या चैतन्याला करावयाचें आहे; तें त्याचें ईश्वरनियत कर्तव्य आहे.

      अज्ञान हें गुप्त आत्म्याचे ठिकाणीं नसतें, तें प्रकट प्रकृतीच्या ठिकाणीं असतें; समग्र प्रकृतीला तें व्यापीत नाहीं. प्रकृति ही सर्वज्ञ ईश्वराची कृति असल्यानें या कृतीला अज्ञान व्यापूं शकत नाहीं. अज्ञान उदयास येतें तें, प्रकृतीचा मूळ प्रकाश व तिचें मूळ पूर्ण सामर्थ्य यांतून कांहीं घटना तयार झाल्यावर, त्या घटनांपैकीं कोणत्यातरी घटनेबरोबर उदयास येतें. अस्तित्वाच्या कोणत्या तत्त्वांत, कोणत्या भूमींत अज्ञानाला उदयाची संधि सांपडते ? अस्तित्वाच्या कोणत्या पायरीवर तें प्रथम उदयास येतें ? अनंत अस्तित्व, अनंत जाणीव, अनंत आनंद ह्या अस्तित्वाच्या सर्वोच्च भूमी आहेत, तेथें अज्ञान असूं शकत नाहीं. सर्व कांहीं या भूमींतूनच निघतें. आमच्या परिचयाचें जें अंधुक प्रकाशाचें, अनिश्चित, अस्थिर रूपांचें व्यक्त विश्व आहे, तें सर्व या उच्च भूमींतून खालीं आलेलें आहे. अतिमानसांतहि अज्ञानाला स्थान असू शकत नाहीं. अनंत प्रकाश व अनंत सामर्थ्य अतिमानसाच्या क्षेत्रांत नेहमीं उपस्थित असतात, अतिशय मर्यादित घटना व वस्तू देखील अतिमानसिक क्षेत्रांत अनंत प्रकाश व अनंत सामर्थ्य यांच्याच प्रकट आधारानें असतात व उदयास येतात. एकतेची जाणीव अतिमानसिक क्षेत्रांत सर्व भेदज्ञानाला व्यापून असते; तेथें भेदज्ञान गौण व एकता प्रधान असते. मनाची भूमि मात्र अशी भूमि असते कीं, तेथें अज्ञान -- अर्थात् खरें आत्मज्ञान मागें टाकणें -- ही क्रिया संभवते. मन ही जाणीवयुक्त अस्तित्वाची (पुरुषाची) अशी शक्ति आहे कीं, ती वस्तूवस्तूंमध्यें, घटनेघटनेमध्यें भेद करते, भेदाच्या मार्गानें चालते. भेदाचें ज्ञान त्याचे ठिकाणीं प्रधान असतें, स्वभावगत असतें; त्याचे ठिकाणीं एकतेचें ज्ञान अगदीं गौण असतें, स्वाभाविक नसतें. भेदज्ञानाच्या मागें अप्रधान, दुय्यम दर्जाची म्हणून एकतेची भावना उपस्थित असते; मनाच्या क्रियांत, त्याचें हृद्गत म्हणून, त्याचें अंतरंग म्हणून एकतेची भावना असत नाहीं. भेदज्ञानाला अभेदाचा आधार देणारी ही एकतेची संवेदना, कोणत्याहि कारणानें मागें घेतां आली, मागें पडली, अतिमानस आणि मन यांच्यामध्यें कशाहि रीतीनें पडदा निर्माण झाला, (कारण एकतेची संवेदना, भावना ही अतिमानसांतून येते, मन ही वस्तु अतिमानसांतून निघालेली

पान क्र. ५२३

 

आहे, अतिमानसाच्या प्रकाशानेंच, प्रतिबिंबित प्रकाशानेंच मन आपले कार्य करीत असतें; एकतेची भावना ही मनाची खाजगी मालमत्ता नव्हेच.) कीं सत्याचा अतिमानसांतील प्रकाश मनाला मिळणार नाहीं, किंवा या मधल्या पडद्यांतून तो प्रकाश विस्कळित किरणांच्या रूपानें, विकृत आणि विभक्त झालेल्या किरणांच्या रूपानें येऊं लागेल आणि मग अज्ञान ही घटना अस्तित्वांत येऊं शकेल; अनेकता, स्वतंत्रांची अनेकता गाजू लागेल. हा जो पडदा सांगितला तो वास्तवांत आहे, मनाच्या क्रियेचेंच फळ म्हणून तो निर्माण झाला आहे, असें उपनिषदांत सांगितलें आहे. अधिमानस हाच तो पडदा म्हणतां येईल. अतिमानस आणि मानस (मन) याच्यामध्यें अधिमानस आहे. हें अधिमानस अतिमानसिक सत्याला झांकणारें सोन्याचें पात्र आहे. हें झांकण अतिमानसिक सत्याचा चेहरा झांकून टाकतें, पण त्याची प्रतिमा स्वच्छपणें प्रतिबिंबित करतें. अधिमानसानंतर मन येतें तें अधिमानसाप्रमाणें स्वच्छ प्रतिबिंब दाखवीत नाहीं -- धुरकट असें, अपारदर्शक असें, किंचित् प्रकाश (प्रकाश किरण) प्रतिबिंबित करणारें असें, मन हें झांकण आहे. मनाच्या ज्या क्रियेनें पडदा उत्पन्न होतो ती क्रिया, भेदांवर, विविधतेवर मनानें एकाग्रतेनें लक्ष देऊन तद्रूप होणें, ही आहे. मनाच्या पातळीवरच्या वर अतिमानसिक क्षेत्रांत एकतेवर एकाग्रतेनें लक्ष दिलें जातें. मन खालीं अनेकतेवर आपलें लक्ष केन्द्रित करतें व यांतूनच पडदा निर्माण होतो. मनाची विशिष्ट स्वाभाविक क्रिया भेदनिष्ठता हीच आहे, भेद हे अभेदांतून निघतात, अभेदमय ऐक्य आविष्कृत करणारे ते असतात. सर्वोच्च एकतेच्या पोटीं जें कांहीं आहे, तें अनेकता व्यक्त करीत असतें; एकता ही अनेकतेचें मायपोट असतें; अनेकतेचा आधार, उगम एकता असते. पण मन अनेकतेवर आपलें लक्ष केन्द्रित करून तिचें मूळ व आधार जी एकता ती विसरून जातें. एकतेला मन विसरलें, तरी एकता मनाला विसरत नाहीं, अतिमानसिक एकताच मनाला आधार देऊन त्याचे व्यवहार शक्य करते; मनाची कार्यमग्न शक्ति मात्र आपलें मूळ विसरते. आपला विशाल खरा आत्मा विसरते. मन आपलें मूळ विसरून रूपें निर्माण करणाऱ्या शक्तीच्या कार्यांत एकाग्र झाल्यानें त्या शक्तीशीं तद्रूप होतें; स्वतःवरचा स्वतःचा ताबा घालविते; कार्याच्या समाधींत स्वतःला पूर्णपणें विसरतें या पूर्ण आत्मविस्मृतीच्या स्थितींत तें आपलें कार्य करीत रहातें; निद्रेंत चालणारा मनुष्य वागतो त्याप्रमाणे मन वागते, नेणीव मनाला ग्रासते आणि या

पान क्र. ५२४

 

नेणिवेंत मन आपलें काम करीत राहतें. या कार्याची जाणीवहि त्याला नसते. जाणीव खालीं उतरत येते, ती या अवस्थेला शेवटीं येते; गाढ झोंप, गाढ समाधि, तंद्री ही ती शेवटली अवस्था असते. ही अवस्था भौतिक निसर्गाच्या व्यवहाराचा सखोल असा पाया होते; या अवस्थेवर भौतिक निसर्गाचा सर्व व्यवहार उभा केलेला असतो.

      जाणीवशक्तीची एकदेशीय हालचाल, रूप आणि क्रिया करण्यांत मग्न होणारी तिची हालचाल जेव्हां तिच्या कार्यक्षेत्रांत एका मर्यादित विभागांत होत असते, तेव्हां तिची एकता, पूर्णता वस्तुत: विभागली जाते असा भाग नाहीं, हें लक्षांत ठेवावयास हवें. मर्यादित क्षेत्रांत पुढें तोंडावर राहून कार्यमग्न झालेली जी शक्ति असते, ती एकंदर पूर्ण जाणीवशक्तीचा एक भाग असतो - हा भाग पुढें आणि बाकीचा भाग मागें गुप्त - पुढें असलेल्या भागाच्या दृष्टीनें गुप्त -- अशी जाणीवशक्तीच्या एकाग्रतेनें विशिष्ट व्यवहार करण्याच्या क्रियेंत, (अचेतनतेंत व अज्ञानांत) वस्तुस्थिति असते; कार्याच्या कोणत्याहि मर्यादित क्षेत्रांत पूर्ण जाणीवशक्ति उपस्थित असते, भौतिक क्षेत्रांत अचेतनतेमागें लपलेली ही पूर्ण शक्ति पूर्ण आत्मसत्तेच्या आधारानें, पुढें केलेल्या अंशशक्तीनें घडत असलेलें सर्व काम त्या अंशशक्तीच्या द्वारां करीत असते, आणि ही अंशशक्ति जीं रूपें तयार करते त्या सर्व रूपांत आत्मरूपानें ही पूर्ण पुरुषप्रकृति कायमचें बिऱ्हाड करते. अज्ञानाचा पडदा जाणीवशक्तीच्या विशिष्ट कार्यांतील अनन्य एकाग्रतेनें तयार होतो हें आपण पाहिलेंच आहे; हा पडदा दूर करण्याची क्रिया ही पण एकाग्रतेची, उलट्या अनन्य एकाग्रतेची क्रिया असते. व्यक्तीच्या जाणिवेंत प्रकृतीची बाह्य आघाडीवर बाह्य एकाग्रतेनें जी क्रिया चाललेली असते, ती बंद करून जाणीवशक्ति गुप्त आंतर पुरुषावर सर्व लक्ष केन्द्रित करते; आत्म्यावर किंवा खऱ्या आंतर चैत्य पुरुषावर, मनोमय पुरुषावर, प्राणमय पुरुषावर जाणीवशक्ति सर्व लक्ष केन्द्रित करते आणि याप्रमाणें त्या पुरुषाचें दर्शन घेते, त्याला गुप्ततेंतून बाहेर काढते. ज्या अनन्य एकाग्रतेनें पुरुष प्रकट होतो त्या अनन्य एकाग्रतेला चिकटून रहावें असें कांहीं पुरुषाच्या जाणीवशक्तीवर बंधन नाहीं; बाह्य एकाग्रता आणि आंतर एकाग्रता ज्या जाणिवेच्या क्रिया असतात, तिला पुन: पूर्ण किंवा व्यापक जाणिवेनें राहणें केव्हांहि शक्य असतें; या पूर्ण वा व्यापक जाणिवेच्या अस्तित्वांत, पुरुषाचें अस्तित्व आणि प्रकृतीची कृति, आणि त्याची उपकरणसामग्री, आत्मा आणि त्याची क्रियाशील आत्मशक्ति

पान क्र. ५२५

 

या दोन्हींचा समावेश असतो. (पूर्ण जाणिवेंत एकाग्रता प्रधान आणि अनेकता गौण असते; व्यापक जाणिवेंत अनेकता प्रधान आणि एकता गौण असते). अशी पूर्णता, व्यापक जाणिवेनें पत्करली, म्हणजे तिच्यापासून जें नामरूपात्मक विश्व तयार झालें होतें त्या विश्वाला विशाल ज्ञानानें, ती स्वतांत समाविष्ट करूं शकते. जाणिवेला पूर्वींची मर्यादा आतां नसते. अंतर्यामी चैतन्याचा विसर प्रकृतीला पूर्वींच्या मर्यादित जाणिवेमुळें पडत होता व त्यामुळें कांहीं विशिष्ट परिणाम घडत होते, त्या परिणामांचा अभाव आतां असतो. अप्रकट पूर्ण जाणिवेचा पुरुष प्रकट अंश-प्रकृतीच्या द्वारां कार्य करीत होता, तो आतां प्रकट होऊन सरळपणें प्रकृतीच्या अंशांकडून कार्य करून घेऊं लागतो; अर्थात् प्रकृतीच्या व्यवहारांत पुष्कळ सुधारणा या परिवर्तनानें होऊं शकते. पण पूर्ण व्यापक जाणीव या व्यवहारापलीकडे जाऊं शकते; प्रकट केलेलें समग्र कार्य स्थगित करून ती पुरुष-प्रकृतीच्या उच्चतर भूमीवर आपलें लक्ष एकाग्र करून, आपलें व पुरुषाचें स्थान त्या उच्चभूमीवर कायम करूं शकते आणि तेथून उच्च शक्ति खालीं आणून, पूर्वींचें आपलें विश्वकार्य त्या उच्चस्थानीय उच्च शक्तींच्या साह्यानें परिवर्तित करूं शकते; त्याला उच्चतर स्वरूप देऊं शकते. प्रकृतिपुरुषाच्या कार्यभूमी अनेक आहेत; आपलें विश्व ज्या कार्यभूमीवर आहे त्याहून उच्च अशा कार्यभूमी आहेत, त्या उच्चकार्यभूमींवर उच्च कार्यसाधनें आहेत, उच्च मूल्यें आहेत; तेथें उच्च अशी सृष्टि, आत्माविष्कारणाची सृष्टि तयार होते; या सृष्टींत, परिवर्तित, उच्च स्वरूप दिलेलें, आमच्या कनिष्ठ भूमीवरचें विश्वकार्य समाविष्ट केलें जातें. आमची जाणीवशक्ति आपलें विकासकार्य मानसिक भूमीवरून अतिमानसिक भूमीवर नेण्याचें ठरविते, तेव्हां ती अतिमानसिक भूमीवर एकाग्रतेनें लक्ष देऊन वर वर्णन केलेलें परिवर्तन घडवून आणते. खालीं उतरून अचेतनतेंत किंवा अज्ञानांत लपण्याची क्रिया काय किंवा वर अतिमानसिक (ज्ञानाच्या) क्षेत्रांत चढण्याची क्रिया काय जाणिवेच्या दोन्ही क्रिया तपाच्या क्रिया आहेत; अनन्य एकाग्रतेच्या क्रिया आहेत; अनंत जाणीव आपल्या प्रकट आत्मरचनेचा प्रकार ठरविते, त्याची साधन-सामग्री ठरविते, त्याची प्रक्रिया ठरविते आणि या पूर्वनियत व्यवस्थेला धरून ती तपाचा आश्रय करते; अर्थात् जशी पूर्वनियत व्यवस्था अनंत जाणिवेनें ठरविली असेल, तिला अनुसरून तिचें तप असतें (तिची अनन्य एकाग्रता असते) आणि म्हणून नियतव्यवस्थाभिन्नतेनें भिन्न झालेल्या

पान क्र. ५२६

 

तपांचीं फळेंहि भिन्न येतात, एकीकडे मानसिक अज्ञान आणि अचेतनता, दुसरीकडे अतिमानसिक ज्ञान आणि अतिचेतनता, अशीं विविध फळें तपाला येतात.

      याप्रमाणें अज्ञानाचें स्वरूप व त्याचें साधन आमच्या लक्षांत आल्यावर आतां असा प्रश्न उभा राहतो कीं, बाह्यतः कां होईना, पण सर्वज्ञ ईश्वर, अज्ञान आणि अचेतनता यांचा अंगीकार करतो; त्याच्या जाणीवयुक्त शक्तीच्या समग्र कार्यांत नव्हे, तर आंशिक कार्यांत अज्ञानी होतो, अचेतन होतो -- ही गोष्ट शक्य कशी होते ? या शक्यतेची गोष्ट गूढच राहते असें मानून चाललें. तरी या रहस्याची क्रिया बरोबर कशी असते, तिचें स्वरूप काय असतें, तिच्या मर्यादा कोणत्या हे ठरवितां आलें, तर तें ज्ञान फायद्याचेंच होईल. त्यायोगें या क्रियेची आपल्याला नसती भीति तरी वाटणार नाहीं, या क्रियेपासून काय साधतें तें कळेल आणि तिच्या प्रयोजनासंबंधीं आपला गैरसमज राहणार नाहीं. तसेंच या क्रियेमुळें आम्हांला कांहीं अनुकूल संधि लाभत असेल, तर तेंहि कळेल आणि त्या संधीचा फायदा आम्हांला घेतां येईल. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, सर्वज्ञ ईश्वर अज्ञानी होतो, अचेतन होतो यांत गूढ कांही नाहीं. या क्रियेला गूढाचें, रहस्याचें रूप मन देतें; अविभाज्याचे भाग पाडणारी बुद्धि ही मानसिक शक्ति, सरळ व्यवहाराला रहस्य करून सोडते. दोन वास्तव घटना व्यक्त करणाऱ्या नांवांमध्यें किंवा कल्पनांमध्यें, या बुद्धीला तर्कदृष्ट्या विरोध दिसला किंवा उत्पन्न करतां आला, कीं त्या दोन दृश्य वास्तव घटनांमध्यें खराच विरोध आहे असा निर्णय ती घेते आणि मग तिला अन्योन्यविरोधी दिसणाऱ्या या दोन गोष्टी अस्तित्वांत एकत्र असूं शकत नाहींत, त्यांच्यामध्यें एकता, अद्वैत असूं शकत नाहीं असा सिद्धांत ती करते आणि त्यामुळें या ''विरोधी'' गोष्टींचें साहचर्य, एकत्व तिला रहस्य होऊन बसतें. वस्तुत: अज्ञान ही ज्ञानाची (सर्वज्ञ ईश्वराच्या ज्ञानाची) एक शक्ति आहे. स्वतःला मर्यादित करण्याची शक्ति आहे, हातीं घेतलेल्या कार्यांत अनन्य एकाग्रतेनें मग्न होण्याची शक्ति आहे. विशिष्ट व्यवहारांत ही एकाग्रता करून, या व्यवहाराच्या पाठीमागें ज्ञान हें आपल्या समग्र ऐश्वर्यानें उपस्थित राहून कार्य करूं शकतें. व्यवहाराची पार्श्वभूमि त्यानें स्वतःच ठरविलेली असते आणि आपल्या प्रकृतीला, क्रियाशक्तीला, त्या पार्श्वभूमीची दखल घेऊन वागण्याचा आदेश त्यानें दिलेला असतो. बुद्धिपुरःसर विशिष्ट हेतूनें स्वत:ला मर्यादा घालून

पान क्र. ५२७

 

घेणें ही त्या हेतूच्या सिद्धीच्या दृष्टीनें सामर्थ्याची क्रिया आहे, दुबळेपणाची नव्हे. पुरुषानें कोणत्याहि हेतूनें एकाग्रतेचा आश्रय करणें यांत त्याचें सामर्थ्य दिसून येतें, यांत सामर्थ्याचाच भाग असतो, दुबळेपणाचा भाग नसतो. अर्थात् अतिमानस आणि मन या भिन्न क्षेत्रांत अनन्य एकाग्रतेचा परिणाम भिन्न भिन्न असतो. अतिमानस जी आत्मशक्तीची एकाग्रता करतें त्या एकाग्रतेंत एकता आणि अनेकता या दोन्ही विश्वविभागांचा समावेश असतो; ही एकाग्रता सर्वसमावेशक, परिपूर्ण, असीम, मर्यादातीत, असते; उलटपक्षीं, मनाची एकाग्रता मर्यादाबद्ध असते, भेद उत्पन्न करणारी असते; या मर्यादांमुळें आणि भेदमयतेमुळें या एकाग्रतेनें वस्तूंचीं जीं मूल्यें निर्माण होतात, तीं एकांगीं, विकृत, अर्धसत्य किंवा असत्य अशीं असतात; पण मर्यादांचा हेतु आपण पाहिला आहे, ज्ञानाच्या एकांगितेचा हेतु आपण पाहिला आहे. हा हेतु जर आम्हीं मान्य केला, तर हा हेतु सिद्ध करणारी शक्ति ही केवल विश्वातीत पुरुषोत्तमाचे ठिकाणीं त्याच्या विश्वनिरपेक्ष पूर्ण शक्तीचा भाग म्हणून असली पाहिजे व असते, हेंहि आम्हीं मान्य करावयास हवें. या पुरुषोत्तमाची पूर्ण जाणीवशक्ति आणि विशिष्ट कार्याकरितां स्वतःला मर्यादित करण्याचें तिचें सामर्थ्य, या दोहोंत विसंवादिता मानण्याचें कांहींच कारण नाहीं; उलट अनंत पुरुषोत्तमाच्या ज्या विविध शक्ती आहेत त्या शक्तींच्यापैकीं, स्वतःला मर्यादित करण्याची, आतांच नमूद केलेली शक्ति ही एक असणें स्वाभाविक आहे, असेंच आम्हीं मानावयास हवें, असें आम्हीं मानणेंच तर्कशुद्ध आहे.

      सर्वज्ञ सर्वातीत निःसंबंध पुरुषोत्तम स्वतःच्या पोटीं संबंधमय विश्व निर्माण करण्याच्या क्रियेनें स्वतःला मर्यादित करीत असतो अशी कांहीं गोष्ट नाहीं; या क्रियेनें त्याला कांहीं मर्यादा पडते ही गोष्ट खोटी आहे; असें विश्व निर्माण करणें हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. त्याचें सर्वातीत, सर्वनिरपेक्ष अस्तित्व, जाणीव (चैतन्य, चेतना), शक्ति (सामर्थ्य), आत्मानंद यांतून स्वाभाविकपणेंच विश्वाची लीला निघते. अनंत पुरुषोत्तम स्वतःच्या अंतरांत अन्योन्यसंबद्ध, अनंत मर्यादित वस्तू व घटना निर्माण करतो, म्हणून कांहीं त्याला या कृतीनें मर्यादा पडत नाहीं, तर त्याचें स्वाभाविक आत्माविष्करणच या निर्मितीनें होत असतें; एकमेवाद्वितीय पुरुषोत्तम अनेक होतो. या अनेकतेनें तो मर्यादित होऊं शकत नाहीं. या अनेकतेच्या आश्रयानें तो आपलें एकमेव अस्तित्व विविध प्रकारें भोगतो. अनंताच्या एकमेवाद्वितीय, अनंत अशा सत्तेचें खरें वर्णन

पान क्र. ५२८

 

करावयाचें तर त्यांत त्याची अनंतप्रकारें अनेक होण्याची शक्ति समाविष्ट करणें आवश्यक आहे. मर्यादित असा अचल काल्पनिक, 'गणिती एकम्' (एक) आणि हा वास्तव, चंचल-अचल, अनंत एकम् (एक) यांत कांहींच साम्य नाहीं. एका टोंकाला अवास्तव 'गणिती एकम्' आणि दुसऱ्या विरुद्ध टोंकाला ''वास्तव'', ''निर्गुण'', ''अनंतगुण'' एकम् अशी वस्तुस्थिति आहे. या पुरुषोत्तमाची, जाणीवयुक्त महासत्तेची एकाग्रता, स्वतःला मर्यादित करणारी एकाग्रता, विविध व्यापारांत स्वतःला बुडवून घेणारी एकाग्रता म्हणजे अज्ञान अशी स्थिति असते : पुरुषोत्तमाच्या ठिकाणची ही, विविधतेनें एकाग्र होण्याची शक्ति, म्हणजेच अज्ञान, म्हणजे काय असतें ? स्वतःच्या आत्मजाणीवयुक्त ज्ञानांत विविधता आणण्याची त्याची जी स्वाभाविक शक्ति तिचेंच नांव अज्ञान. नि:संबंध, पूर्ण पुरुषोत्तम आत्माविष्कारांत ज्या अनेक संबंधमय अवस्था अनुभवूं शकतो, त्या अनेकींपैकीं एक संबंधमय अवस्था, तो अज्ञान या शक्तीनें अनुभवीत असतो; अनंत पुरुषोत्तम सान्त, समर्याद घटनांच्या ज्या माला आपल्या आत्माविष्कारांत उभ्या करतो, त्या मालांपैकीं एक माला, अज्ञान-शक्तीनें, तो उभी करीत असतो. एकमेवाद्वितीय पुरुषोत्तम अनेकतापूर्ण विश्वांत जो आत्मानंद भोगतो, त्या आत्मानंदाचा एक प्रकार तो अज्ञानशक्तीच्या द्वारां भोगीत असतो. अर्थात् निःसंबंध, पूर्ण, अनंत, एकमेवाद्वितीय पुरुषोत्तमाला ज्या अनेक अवस्था अथवा भूमिका शक्य आहेत, त्यांपैकीं एक अवस्था अथवा भूमिका म्हणजेच ही अज्ञान-अवस्था आहे. पुरुषोत्तमाच्या जाणीवशक्तीची एकाग्रतेची जी शक्ति आहे, तिचा एक प्रकार म्हणजे आत्ममग्न होऊन विश्वाला विसरणें. (विश्वाची विस्मृति जाणिवेला झाली, तरी विश्व कांहीं अस्तित्वांतून नाहींसें होत नाहीं; विश्वाची उपस्थिति आणि विश्वाची विस्मृति समकालीन असतात); एकाग्रतेच्या शक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे जाणिवेनें विश्वाच्या व्यवहारांत बुडून जाऊन आत्म्याला विसरणें. येथें सुद्धां विश्वव्यवहारी जाणीव आत्म्याला विसरली म्हणून आत्मा विश्वव्यवहाराला विसरतो असें नाहीं, तर तो गुप्त राहून विश्वाचा व्यवहार सर्व काळ करीत राहतो. हे दोन प्रकार उत्तर व दक्षिण ध्रुवांसारखे एकमेकांपासून दूर आणि एकमेकांना विरोधी भासणारे आहेत. पण सच्चिदानंद पुरुषोत्तम या दोन शक्तींपैकीं एकीनेंहि बांधला जात नाहीं; त्याचें परिपूर्ण आत्मज्ञ अस्तित्व या दोन दर्शनी विरोधी शक्तींना पोटांत वागवितें व त्या दोहोंच्या वरतीं,

पान क्र. ५२९

 

दोहोंना पुरून उरतें. या शक्ती एकमेकींचा विरोध करीत असल्यासारख्या दिसल्या, तरी या विरोधाच्या द्वारांहि त्या दोघीहि अन्योन्यसाहाय्यक होऊन, अनिर्वचनीय अशा पुरुषोत्तमाचें प्रकट दर्शन घडवीत असतात, त्याच्या अव्यक्त स्वरूपाला व्यक्त करीत असतात.

पान क्र. ५३०

 

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates